शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

वाढत्या अतिक्रमणाला कुणाचा अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:38 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहाद्यातील अतिक्रमण हटावनंतर तळोद्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु नंदुरबारात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहाद्यातील अतिक्रमण हटावनंतर तळोद्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु नंदुरबारात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असूनही तसेच पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्षभरापूर्वी पत्र देवूनही नंदुरबारातील अतिक्रमणांना अभय दिला जात असल्याच्या प्रतिक्रीया शहरवासीयांच्या आहेत.जिल्हा मुख्यालयाचे शहर असल्यामुळे पालिकेतर्फे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु वाढत्या अतिक्रमणामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे पालिका आणि जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे चागलेच फावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहादा व तळोद्याबाबत मनावर घेतल्यानंतर आता नंदुरबारबाबतही सक्त पाऊल उचलावे अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.रस्ते झाले अधिकच अरुंदशहरातील रस्ते आधीच अरुंद व चिंचोळे आहेत. त्यात अतिक्रमण अधीक वाढल्याने या रस्त्यांवरून दोन वाहने निघणेही मोठे जिकरीचे ठरते. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होणे, लहान, मोठे अपघात होणे असे प्रकार होतात. अनेकांनी घराचे, दुकानांचे ओटे वाढवून घेतले, पुढेपर्यंत पायºया आणल्या आहेत. काहींनी पत्र्यांचे शेड तयार करून घेतले आहे.बºयाच दुकानदारांनी दुकानासमोर विक्रीचा माल ठेवला आहे. त्यामुळे रस्ते पुर्ण ब्लॉक होत आहेत. वाहनचालकांना वाहन चालवितांना मोठी कसरत होते. या बाबी पालिकेच्या अख्त्यारीतील असतांनाही पालिका याबाबत नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.चौकांना आले बकालपणशहरातील मुख्य चौकांना फेरीवाल्यांनी बकाल स्वरूप आणले आहे. कुठलीही शिस्त न ठेवता कुठेही आणि कशाही पद्धतीने लॉरी व वस्तू आणि भाजीपाला विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यात जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, दिनदयाल चौक रस्ता, सुभाष चौक, अमृत चौक, मंगळ बाजार, तूप बाजार, शास्त्री मार्केट, जळकाबाजार, सिंधी कॉलनी या भागाचा समावेश आहे. अशा ठिकाणी बाजारात जाण्यासाठी महिला वर्ग धजावत नसल्याची स्थिती आहे.बाजाराच्या दिवशी तर मोठी समस्या निर्माण होते. बाजारात दुचाकी व तिनचाकी वाहने नेण्यास बंदी घालणे अपेक्षीत असतांना त्याबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. पूर्वी बाजाराच्या दिवशी वाहनांना बंदी राहत होती. आता मात्र सर्रास वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत देखील जाते.पोलीस चौकी हरवलीमंगळ बाजारात मंगळ गेट पोलीस चौकी आहे. या चौकीलाच विविध वस्तू, भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी वेढा घातला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे की नाही हाच प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनाच अतिक्रमणधारकांनी वेठीस धरले तर सर्वसामान्यांची काय गत अशी स्थिती येथे आहे. हीच परिस्थिती जळका बाजार पोलीस चौकीच्या परिसरात देखील आहे.पक्के अतिक्रमणेही...शहरात कच्चे अतिक्रमणाबरोबर पक्के अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेकांनी परवाणगी नसतांना बांधकाम केले आहेत. दादागिरी, राजकीय वरदहस्त आणि पालिकेला न जुमानणाºयांचे हे अतिक्रमण आहे.पालिका कारवाई करतांना लहान व कच्चे अतिक्रमणांवर कारवाई करते. परंतु पक्के अतिक्रमण धारकांवर कारवाईची हिंमत पालिकेची होत नाही. त्यामुळे अतिक्रमण हटवितांना सर्वांनाच समान न्याय दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वर्षभरापूर्वी पालिकेने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देवून अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यलय स्तरावरून वर्षभरापासून काहीही हालचाल झाली नसल्याचे दिसून येते.अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही पालिकेची असतांना पालिका मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे टोलवत आहे. यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न नंदुरबारात निकाली लागणे मोठे जिकरीचे असल्याचे दिसून येत आहे.आतातरी पालिकेने आणि जिल्हाधिकाºयांनी गांभिर्याने घेवून अतिक्रमण काढण्यासंदर्भात कडक कार्यवाही करून निर्णय घ्यावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.