शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

काही दिवसांपूर्वी परत आले ्रपुन्हा लॉकडाऊन होताच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच आपआपल्या गावी निघून गेले होते़ यातील काही जून महिन्यात परतले होते़ परंतु पुन्हा लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पाहून अनेकजण पुन्हा घरी रवाना झाले आहेत़
जिल्ह्यात खाद्यपदार्थ आणि बांधकाम व्यवसायात राजस्थानी, मेहनत आणि मजूरीच्या कामासाठी उत्तर प्रदेश तर रेल्वेच्या किरकोळ कामांत बिहारी मजूर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत़ यात मध्यप्रदेशातून येणारे मजूरही शहरात काम मिळवू लागले आहेत़ रेल्वेने येथे येणे सोयीस्कर असल्याने अनेकांनी याठिकाणी बस्तान मांडले आहे़ यातील काही हे येथीलच रहिवासी झाले आहेत़ तर काहींचा परिवार आजही गावीच आहे़ यातून वर्षातून दोन महिने गावी जावून हे मजूर व व्यावसायिक कुटंूबासोबत घालवतात़ मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी यातील बºयाच जणांनी स्वत:ची सोय करुन घेत गावाचा रस्ता धरला होता़ स्थानिक ठेकेदाराकडे हिशोब करुन ते रवाना झाले आहेत़ दोन महिने घरी राहिल्यानंतर जूनच्या मध्यात यातील काही परत आले होते़ परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि दीड महिन्यात दोन वेळा झालेले किरकोळ लॉकडाऊन यामुळे त्यांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले आहे़ परिणामी घराचे बांधकाम पूर्ण होऊनही अनेकांचे छताचे पीओपी, फ्लोरींग, कोटा फरशीची कटाई आणि बसवणे यासह किरकोळ बांधकाम व दुरूस्त्या बंद पडल्या आहेत़ दुसरीकडे नंदुरबारसह इतर शहरी भागात राजस्थानी चवीचे ‘इन्सस्टंट’ खाद्य पदार्थ आणि मिठाई तयार करणारे राजस्थानी कारागिरही परत गेले असल्याने या दुकानांनाही घरघर लागली आहे़ अनेकांची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने सुरू झाली असली तरी त्यात ‘ती’ चव नसल्याने व्यवसाय बंद पडले आहेत़
सोबत शहरातील विविध भागात पाणीपुरी, शेंगदाणे-फुटाणे यासह इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारेही दिसून येत नाहीत़ बहुतांश उत्तर भारतीय मजूर हे गावी गेल्याने मेहनतीचे काम असलेली बांधकाम, रेल्वेची खडी रचण्याची कामे, सिमेंट व्लॉक तयार करण्याची कामेही बंद पडली आहेत़

४नंदुरबार शहरात सुमारे दीड हजार राजस्थानी कारागीर आहेत़ यातील बहुतांश हे बांधकाम क्षेत्राशी तर ५०० च्या जवळपास कारागीर हे हॉटेल व्यवसायात आहेत़
४बांधकाम क्षेत्रातील कारागिर घरी गेले असल्याने अनेकांच्या घरांची काम पूर्ण होवू शकलेली नाहीत़ हे कारागिर रक्षाबंधननंतर परत येतील असा अंदाज आहे़
४उत्तर प्रदेशातील बहुतांश कामगार हे बांधकामावर मजूरीसह चौकीदारी, रस्ते काम तसेच इतर मजूरीच्या कामात सक्रीय होते़ हे सर्वच परत गेले आहेत़ मजूरांना येण्यासाठी साधने मिळत नसल्याने त्यांचा म्हणून तेवढा राबता अद्याप नाही़ किमान एक हजारच्या जवळपास कामगार कुटूंबांसह परत येतील़ सोबत बिहारी मजूरही परत येणार आहेत़

४हॉटेल्समध्ये सफाई, वेटर तसेच पदार्थ तयार करणाºया राजस्थानी आणि उत्तरप्रदेशातील कामगारांना मोठी मागणी असते़ शहरातील परप्रांतीयांची ७० टक्के खाद्यपदार्थ दुकाने आणि हॉटेल्स यात मनुष्यबळ नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे़ यातून त्यावर आधारित व्यवसायांचिही घडी विस्कटली आहे़