शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

काही दिवसांपूर्वी परत आले ्रपुन्हा लॉकडाऊन होताच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच आपआपल्या गावी निघून गेले होते़ यातील काही जून महिन्यात परतले होते़ परंतु पुन्हा लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पाहून अनेकजण पुन्हा घरी रवाना झाले आहेत़जिल्ह्यात खाद्यपदार्थ आणि बांधकाम व्यवसायात राजस्थानी, मेहनत आणि मजूरीच्या कामासाठी उत्तर प्रदेश तर रेल्वेच्या किरकोळ कामांत बिहारी मजूर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत़ यात मध्यप्रदेशातून येणारे मजूरही शहरात काम मिळवू लागले आहेत़ रेल्वेने येथे येणे सोयीस्कर असल्याने अनेकांनी याठिकाणी बस्तान मांडले आहे़ यातील काही हे येथीलच रहिवासी झाले आहेत़ तर काहींचा परिवार आजही गावीच आहे़ यातून वर्षातून दोन महिने गावी जावून हे मजूर व व्यावसायिक कुटंूबासोबत घालवतात़ मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी यातील बºयाच जणांनी स्वत:ची सोय करुन घेत गावाचा रस्ता धरला होता़ स्थानिक ठेकेदाराकडे हिशोब करुन ते रवाना झाले आहेत़ दोन महिने घरी राहिल्यानंतर जूनच्या मध्यात यातील काही परत आले होते़ परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि दीड महिन्यात दोन वेळा झालेले किरकोळ लॉकडाऊन यामुळे त्यांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले आहे़ परिणामी घराचे बांधकाम पूर्ण होऊनही अनेकांचे छताचे पीओपी, फ्लोरींग, कोटा फरशीची कटाई आणि बसवणे यासह किरकोळ बांधकाम व दुरूस्त्या बंद पडल्या आहेत़ दुसरीकडे नंदुरबारसह इतर शहरी भागात राजस्थानी चवीचे ‘इन्सस्टंट’ खाद्य पदार्थ आणि मिठाई तयार करणारे राजस्थानी कारागिरही परत गेले असल्याने या दुकानांनाही घरघर लागली आहे़ अनेकांची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने सुरू झाली असली तरी त्यात ‘ती’ चव नसल्याने व्यवसाय बंद पडले आहेत़सोबत शहरातील विविध भागात पाणीपुरी, शेंगदाणे-फुटाणे यासह इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारेही दिसून येत नाहीत़ बहुतांश उत्तर भारतीय मजूर हे गावी गेल्याने मेहनतीचे काम असलेली बांधकाम, रेल्वेची खडी रचण्याची कामे, सिमेंट व्लॉक तयार करण्याची कामेही बंद पडली आहेत़४नंदुरबार शहरात सुमारे दीड हजार राजस्थानी कारागीर आहेत़ यातील बहुतांश हे बांधकाम क्षेत्राशी तर ५०० च्या जवळपास कारागीर हे हॉटेल व्यवसायात आहेत़४बांधकाम क्षेत्रातील कारागिर घरी गेले असल्याने अनेकांच्या घरांची काम पूर्ण होवू शकलेली नाहीत़ हे कारागिर रक्षाबंधननंतर परत येतील असा अंदाज आहे़४उत्तर प्रदेशातील बहुतांश कामगार हे बांधकामावर मजूरीसह चौकीदारी, रस्ते काम तसेच इतर मजूरीच्या कामात सक्रीय होते़ हे सर्वच परत गेले आहेत़ मजूरांना येण्यासाठी साधने मिळत नसल्याने त्यांचा म्हणून तेवढा राबता अद्याप नाही़ किमान एक हजारच्या जवळपास कामगार कुटूंबांसह परत येतील़ सोबत बिहारी मजूरही परत येणार आहेत़४हॉटेल्समध्ये सफाई, वेटर तसेच पदार्थ तयार करणाºया राजस्थानी आणि उत्तरप्रदेशातील कामगारांना मोठी मागणी असते़ शहरातील परप्रांतीयांची ७० टक्के खाद्यपदार्थ दुकाने आणि हॉटेल्स यात मनुष्यबळ नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे़ यातून त्यावर आधारित व्यवसायांचिही घडी विस्कटली आहे़