शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

अपनेही घर में हम कैसे हुए पराये...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

नंदुरबार : राजकारणात निष्ठेला महत्त्व असते, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, अलीकडे सत्ताकेंद्रित राजकारणात निष्ठेला मात्र फारसे महत्त्व राहिले ...

नंदुरबार : राजकारणात निष्ठेला महत्त्व असते, असे नेहमी सांगितले जाते. मात्र, अलीकडे सत्ताकेंद्रित राजकारणात निष्ठेला मात्र फारसे महत्त्व राहिले नाही. व्यक्तीचे ‘वजन’ लक्षात घेऊन त्याचे राजकारणातील स्थान निश्चित केले जाते. असेच काहीसे चित्र नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणातही पाहायला मिळत आहे. विशेषत: काँग्रेस पक्षात अलीकडेच जिल्हा परिषदेच्या चार सदस्यांना बजावलेल्या नोटिसींचे पडसाद उमटू लागले असून, त्यातून ज्या सदस्यांना नोटिसी बजावल्या त्यांचे ‘अपनेही घर में हम कैसे हुए पराये...’ असा सूर उमटू लागला आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेत ११ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत वित्त आयोगाच्या निधी सर्व सदस्यांना समान वाटप करावा यासंदर्भातील निवेदनावर सही केल्याच्या कारणावरून काँग्रेसचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचे पुत्र अजित सुरूपसिंग नाईक, मधुकर सुरूपसिंग नाईक, देवमन पवार व शरद वसावे या चार सदस्यांना काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नोटीस बजावली. या नोटिसीवर काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील चित्र पाहिल्यास जिल्ह्यात सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काँग्रेस पक्षातच आजवर वाटचाल करणारे व पक्षाशी निष्ठा बाळगणारे एकमेव नेते म्हणजे माजी मंत्री सुरूपसिंग नाईक हे एकमेव आहेत. आज काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व ज्येष्ठ नेते असले तरी त्यांचा प्रवास कुठल्या ना कुठल्या पक्षात झाला आहे. ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांची सुरुवात जनता दलापासून आहे. त्यानंतर काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवून विजय मिळविला होता व पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनीदेखील एक वेळ गवळी सेनेकडून निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी त्यांचे पुत्र भरत गावित यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. स्व. बटेसिंग रघुवंशी व त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र चंद्रकांत रघुवंशी हेदेखील अनेक वर्षे काँग्रेसवासी होते. मात्र, दीड वर्षापूर्वीच त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे केवळ अपवाद आता ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक हेच राहिले आहेत. १९६० पासून त्यांची काँग्रेस पक्षात वाटचाल सुरू आहे. या काळात स्व. इंदिरा गांधी, स्व. राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांचे ते निकटवर्ती राहिले आहेत. वयोमानाने ते निवडणुकीपासून अलिप्त असले तरी त्यांचे पुत्र शिरीष नाईक हे काँग्रेसचे आमदार आहेत, तसेच त्यांचे दोन्ही पुत्र व स्नुषा यादेखील काँग्रेसच्याच राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे निष्ठावान घराणे म्हणजे नाईक घराणे हे ओळखले जाते. याच घराण्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांना व त्यांच्याच गटातील इतर दोन सदस्यांना पक्षाने नोटीस बजावल्याने राजकीय पडसाद उमटणे स्वाभाविकच आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अद्याप नियुक्त झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही नोटीस बजावली आहे. नाईक हे आज मंत्री के.सी. पाडवी यांचे निकटवर्ती मानले जातात. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनीच नाईक घराण्यातील सदस्यांना पक्षशिस्तीचा भंग केल्याची नोटीस बजावली आहे. त्यावर संबंधितांनी आपण कुठलीही पक्षशिस्त मोडलेली नाही, विकासकामांबाबत सार्वजनिक भूमिका घेतली आहे. ती पक्षाच्या शिस्तीत मोडत नाही. पक्षाचीही विकासाबाबत सर्वसमान भूमिका असल्याने तीच भूमिका आपण घेतली; पण त्याचे कारण पुढे करून नोटीस बजावणे निश्चितच भेद निर्माण करणारी भूमिका असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. जे पक्षात निष्ठावान आहेत त्यांनाच आता बाहेरील पक्षातून येऊन लोक नोटिसा बजावत आहेत, अशी राजकीय चर्चा सध्या यानिमित्ताने सुरू झाल्याने तो सर्वच पक्षांसाठी विचार करायला भाग पाडणारा विषय ठरला आहे. काँग्रेसच्या चार जिल्हा परिषद सदस्यांना जिल्हा कार्याध्यक्षांची नोटीस बजावण्यामागील भूमिका काय होती, तो विषय वेगळा असला तरी त्यानिमित्ताने काँग्रेसअंतर्गत मोठे राजकारण शिजत असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात काँग्रेसचेच कार्यकर्ते करत आहेत.