शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात चार बालविवाह थांबवून ‘ती’ला जगण्याची उमेद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:20 IST

नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकविध समस्या सतावत आहेत. बालविवाहासारख्या गंभीर समस्येने या काळात पुन्हा डोके वर काढल्याचे ...

नंदुरबार : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात अनेकविध समस्या सतावत आहेत. बालविवाहासारख्या गंभीर समस्येने या काळात पुन्हा डोके वर काढल्याचे समोर आले होते; परंतु महिला बालविकास विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने चार बालविवाहांना चाप बसून मुलींना जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे.

कोरोनाकाळात चाइल्डलाइन, बाल संरक्षण कक्ष, बालकल्याण समिती यांनी कारवाईचा धडाका लावल्याने सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा, मध्यप्रदेशातील खेतिया परिसर, तळोदा व प्रकाशा, ता. शहादा येथे होऊ घातलेले बालविवाह रोखले गेले आहेत. कोरोनाकाळातील बेरोजगारी, तसेच आर्थिक चणचण यातून पालकांनी कमी खर्चात विवाह होतो या सबबीखाली हे विवाह नियोजित केले होते; परंतु मुलींचे वयच कमी असल्याचे समोर आल्यानंतर ते विवाह रद्द करून पालकांना समज देण्यात आली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात सातत्याने जाणीवजागृती सुरू असते. बालविवाह होत असेल तर नागरिकांनी चाइल्डलाइनशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी कळविले आहे.

जुन्या चालीरीतींमुळे काही समाजांमध्ये बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर चाइल्डलाइनकडे तक्रारी दाखल होतात. त्यानंतर चाइल्डलाइन, बालसंरक्षण कक्ष आणि पोलिसांचे पथक बालविवाह रोखतात. त्यानंतर बालकल्याण समितीमार्फत संबंधितांवर गुन्हा दाखल केला जातो, अशी माहिती चाइल्डलाइनचे समन्वयक आशिष शेवाळे यांनी दिली. दरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातील अमलीपाडा येथे गेल्या १५ दिवसांपूर्वीच एक विवाह थांबविण्यात आला. यात मुलगी १४ वर्षांची, तर मुलगा अवघा १६ वर्षांचा होता. जिल्हा महिला समुपदेशन कक्षाच्या सुमित्रा वसावे यांनी हा विवाह थांबविला होता. यातील मुलीला खापर येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातही प्रवेश मिळवून देण्यात आला आहे.

मुलींची संख्या कमी

जिल्ह्यात माध्यमिक शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांच्या तुलनेत मुलींची पटसंख्या कमी असल्याचे दिसून आले आहे. पटसंख्या कमी होण्यास इतरही अनेक कारणे आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याच मुलींची शाळा सुटली आहे. या मुलींचे शिक्षण सुरू होण्याची आवश्यकता आहे.

विवाह रोखण्यासाठी सेविकांची मदत

कोरोनाकाळात बालविवाह करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले असले तरी पुन्हा ते होऊ नयेत यासाठी महिला बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका व सरपंच यांच्या दर महिन्याला बैठका घेऊन गावातील विवाहांची माहिती घेतली जाणार आहे.

मुलगी म्हणजे चिंता म्हणून...

जिल्ह्यात यापूर्वी झालेले बालविवाह हे केवळ पालकांची मुलींप्रती असलेली चिंता यातून झालेले आहेत. चांगले स्थळ मिळत नाही, म्हणून जे आले ते चांगले असा विचार करून मुलींचा अल्पवयात विवाह करण्याचा घाट घातला जातो.

बालविवाह रोखण्यासाठी महिला व बालविकास विभागाने सर्व स्तरावर सूचना केल्या आहेत. विभागाकडून वारंवार सामाजिक संस्थांच्या संपर्कात राहून बालविवाहांचा आढावा घेतला जातो.

- उमेश पाडवी

जिल्हा समन्वयक, नंदुरबार

काही समाजातील जुन्या चालीरीतींमुळे बालविवाहाचे प्रमाण आजही मोठे आहे. मुलगी मोठी झाली तर मुलगा भेटणार नाही अशी भीती असते; परंतु पालकांनी लहान वयात मुलींचे लग्न करू नये.

-राहुल जगताप

जिल्हा महिला समुपदेशन कक्ष