शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:51 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडला लागून असलेल्या साळी गल्ली भागात तुटक्या व काही ठिकाणी गटारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील जुना प्रकाशा रोडला लागून असलेल्या साळी गल्ली भागात तुटक्या व काही ठिकाणी गटारी बुजल्या गेल्याने सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी जागा नसल्यामुळे या परिसरात असलेल्या खाजगी मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर सांडपाण्याची डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचप्रमाणे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने याकडे लक्ष देऊन साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी सोय करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.जुना प्रकाशा रोड भागाला लागून गांधी चौक, गुजर गल्ली, साळी गल्ली या शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या वसाहती आहेत. या वसाहतीतील घरांमधील सांडपाण्याचा निचरा याच गटारीमधून केला जातो. तेच पाणी पुढे जाऊन नदीपात्रात सोडले जाते. मात्र साळी गल्लीत काही ठिकाणी गटारी जीर्ण व तुटक्या झाल्याने बुजल्या गेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी गटारीतून न वाहता या भागातील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर असलेल्या खाजगी मोकळ्या जागांमध्ये सांडपाण्याचे डबके साचत आहेत. या परिसरात साचून असलेल्या सांडपाण्याच्या निचरा होत नसल्यामुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात वराहांचाही वावर वाढल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.एकीकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच या सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून विविध आजार डोके वर काढत असल्याने नागरिकांना आजारांना बळी पडावे लागत आहे. या साठलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये वराहांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्याने ही मुले या डबक्याजवळच खेळत असल्याचे चित्र आहे.सांडपाणी ज्याठिकाणी साचत आहे. त्याठिकाणी या भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरे बांधण्यासाठी व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी खळे तयार केले आहेत. मात्र गटारच बुजली गेल्याने हे सर्व सांडपाणी हळूहळू आता खळ्यांमध्ये यायला सुरुवात झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाच्या संबंधित अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित दुरुस्ती करून उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.