शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी ‘गुजरात बंदी’ची कठोर अंमलबजावणी व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:45 PM

n  रमाकांत पाटील     लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या कहर सद्या गुजरातमध्ये वाढत असल्याने त्याचा धोका सिमेवर असलेल्या ...

n  रमाकांत पाटील    लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या कहर सद्या गुजरातमध्ये वाढत असल्याने त्याचा धोका सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यालाही वाढला आहे. त्यामुळे गुजरात बंदीची काही दिवस कठोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सिमेवर आहे. सुरुवातीच्या काळात या जिल्ह्याने कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या होत्या. विशेषत: प्रशासनाबरोबर नागरिकही त्यात सहभागी झाले होते. राज्यांच्या सिमा रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी खास ग्राम रक्षक दलाची स्थापना केली होती. त्यामुळे राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावरील सिमा तथा परजिल्ह्यांच्या सिमाही सील करण्यात आल्या होत्या. परिणामी महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना तब्बल दोन महिने जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नव्हते. मात्र, पहिला रुग्ण आढळला तो गुजरातच्या मार्गेच आल्याचे प्रशासनाने त्यावेळी सांगितले होते.आज आठ महिन्यांतर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण निश्चित वाढले, पण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. सद्य स्थितीत जिल्ह्यात सहा हजार २४२ रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी पाच हजार ८४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. केवळ २४८ रुग्ण सद्या उपचार घेत आहेत. तर १५१ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपासून नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. हे प्रमाण स्वॅब तपासणीच्या तुलनेत दहा टक्केच्याही आत आले आहे. अशा स्थितीत दिवाळीनंतर गेल्या आठवडाभरात गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सुरत, बडोदा, अहमदाबाद, राजकोट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नवीन रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे या भागात नंदुरबार जिल्ह्यासह खान्देशातील लोकांचे प्रमाण मोठे आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये प्लेगची साथ आली होती, एका ज्योतीषाने उकई धरण फुटण्याचे भाकित केले होते. त्यावेळी सुरतमधून खान्देशात लोकांचे लोंढेच्या लोंढे आले. एवढेच नव्हे तर गेल्या दहा वर्षात तापीला आलेल्या महापूराच्या वेळी देखील त्या भागातील लोक खान्देशात परतले होते. अशी स्थिती सद्या नसली तरी बहुतांश लोक गुजरातमधून विश्रांतीसाठी आपल्या मुळगावी येत असल्याचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. प्रवासी रेल्वे बंद असल्याने एक्सप्रेस रेल्वेगाड्यात काही नागरिक येत आहेत. परंतु बहुतांश लोकं दुचाकी व चारचाकीने ग्रामिण मार्गातून येत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने सात ठिकाणी पोलीस दलामार्फत नाकाबंदी करणार आहेत. त्यात वाका चार रस्ता, केसरपाडा, कोरीट चौफुली, बेडीकीनाका, करोड-मरोड, देवापाटनाला, वडफळी, गव्हाळीनाका व डोडवा या ठिकाणांचा समावेश आहे. असे असले तरी इतरही छूपे मार्ग आहेत. त्यामुळे त्या रस्त्यांवरही बंदी करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: त्यासाठी पूर्वीप्रमाणेच ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली तर प्रशासनासोबत लोकांचाही सहभाग वाढून निर्णयाची अंमलबजावणी करता येईल. 

सिमावर्ती रस्त्यांवर स्वॅब तपासणीची व्हावीn महाराष्ट्र आणि गुजरात अर्थातच नंदुरबार जिल्ह्याचा संपर्क गुजरातशी मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक गावांचे व्यवहार तर एकमेकांशी जुळले आहेत. कारण गुजरात आणि महाराष्ट्राची सिमा एकमेकांमध्ये मिसळल्याने रोजच्या नागरिकांचा संपर्क आहे. अशा स्थितीत गुजरात बंदी निर्णयाची अंमलबजावणी करतांना काळजीपूर्वक नियोजन आवश्यक आहे. गुजरातमध्ये प्रवेश करतांना सुरत शहरात महाराष्ट्रातील कुठलेही वाहन गेल्यास त्यातील प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाते. त्यानंतरच शहरात प्रवेश दिला जातो. अशी काही उपाययोजना गुजरातमधून येणाऱ्या वाहन तपासणीसाठी करता येईल का? त्याचाही विचार होणे आवश्यक आहे.