शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

शासनातर्फे ज्वारी व मका खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

गेल्यावर्षी समाधानकारक पावसाळा झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, भुईमूग, मका, ज्वारी ...

गेल्यावर्षी समाधानकारक पावसाळा झाल्याने सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षीही रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा, भुईमूग, मका, ज्वारी पिकांचा पेरा केला होता. त्यात ज्वारी व मका या पिकांना शासनाने अनुक्रमे दोन हजार ६५० व एक हजार ८५० भाव जाहीर करून खरेदी करण्याचे जाहीर केले होते. तर, बाहेर खाजगी व्यापारी व बाजार समितीमध्ये एक हजार २०० ते एक हजार ४०० पर्यंत भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे क्विंटलमागे हजार ते एक हजार २०० रुपयांचे नुकसान होऊ शकते.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ज्वारी व मक्याची काढणी करून साठवून ठेवला आहे. शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे रीतसर नोंदणीदेखील केलेली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीस शासकीय खरेदी केंद्रे सुरू करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आठवडा उलटून गेला तरी अद्याप खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तयार असलेला माल शेतकऱ्यांनी खळ्यात किंवा शेतातच झाकून ठेवल्याने अवकाळी पावसाची भीती सतावत आहे.

खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेपल्याने शेतकरी मशागतीकडे वळला असून, त्यात पिकवलेला माल तसाच पडून असल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. बाहेर मार्केटला हजार ते एक हजार २०० रुपये दर कमी मिळत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे लक्ष शासकीय खरेदी केंद्राकडे लागून आहे. मान्सून तोंडावर येऊन ठेपला असून बियाणे, रासायनिक खते, शेती अवजारे खरेदीसाठी शेतकरी हतबल झाला आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनदेखील अद्याप कुठलाही खुलासा होत नसल्याचे नंदुरबार बाजार समितीचे माजी सभापती दिनेश पाटील यांनी सांगितले. शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील ज्वारी व मका उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून, आर्थिक संकटातून शेतकरी वाचू शकेल. म्हणून शासनाने शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.