शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दामिनी पथक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखेर नंदुरबार पोलिसांना जाग आल्यानंतर टारगट युवक आणि रोडरोमियोंवर कारवाईसाठी दामिनी पथक आणि साध्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अखेर नंदुरबार पोलिसांना जाग आल्यानंतर टारगट युवक आणि रोडरोमियोंवर कारवाईसाठी दामिनी पथक आणि साध्या वेशातील पोलिसांचे पथक रस्त्यावर उतरल्याचे चित्र शहरातील विविध चौकात दिसून आले. अनेक ठिकाणी युवकांना पिटाळून लावण्यात आले तर काही जणांना तंबी देवून सोडून देण्यात आले. याबाबत ‘लोकमत’ने शनिवार, 30 नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.शहरातील चौकाचौकात आणि शाळा, महाविद्यालय परिसर, खाजगी क्लास परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून टारगट युवक आणि रोडरोमियोंनी उच्छाद मांडला होता. महिला, तरुणी, विद्यार्थीनी यांना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पोलिसांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले होते. पालकांनी शाळा व्यवस्थापनांकडे तक्रारी करून व शाळांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नव्हता. त्यामुळे अशा युवकांचे फावले होते. याबाबत ‘लोकमत’ने शनिवार, 30 नोव्हेंबरच्या अंकात यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी त्याची गांभिर्याने दखल घेत  शहर पोलिसांना सक्तीने कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने दामिनी पथक, साध्या वेशातील पोलिसांचे पथक कार्यान्वीत करण्यात आले आहे. याशिवाय वाहतूक पोलिसांना अशा टारगट युवकांच्या वाहनांवर फौजदारी व दंडात्मक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्याचा परिणाम सोमवारी दिसून आला. दामिनी पथकाचे वाहन    सकाळी दहा ते दुपारी एक व सायंकाळी चार ते रात्री सात वाजेर्पयत गस्त घालतांना दिसून आले. याशिवाय या पथकांनी अनेक चौकातील टारगट युवकांना पिटाळून लावले. काहींना ताब्यात घेवून तंबी देत सोडून दिले. वाहतूक पोलिसांनी देखील टारगट युवकांच्या दुचाकींवर थेट कारवाई केल्याचे चित्र दिनदयाल चौक, पालिका चौक, मोठा मारुती मंदीर परिसर, नेहरू चौक, मिशन विद्यालय परिसर या ठिकाणी दिसून आले. यामुळे अशा युवकांवर जरब बसली आहे. पोलिसांनी या कारवाईत   सातत्य ठेवावे अशी अपेक्षा पालक आणि शाळा व्यवस्थापनांकडून होत आहे.    

टारगट युवकांवर कारवाई नंतर काही दिवसांनी हे युवक पुन्हा त्याच वाटेला जातात. त्यामुळे अशा युवकांवर कारवाई करतांना त्यांच्या पालकांवरही ती झाली पाहिजे. जेणेकरून युवक पुन्हा त्या वाटेला जाणार नाहीत. अशा प्रतिक्रिया काही शाळांनी व्यक्त केल्या.