शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
2
मध्यमवर्गीयांना बसणार महागाईचा चटका? दिग्गज बँकर उदय कोटक यांचा आगामी आर्थिक संकटाबाबत इशारा
3
Monsoon Update : उकाड्यापासून दिलासा कधी मिळणार? मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; वाचा हवामान खात्याचा नवा अंदाज
4
Preity Zinta: पंजाब किंग्जचा पराभवाचा चौकार, मालकीण प्रिती झिंटा भडकली, मध्यरात्री लिहिलेली पोस्ट चर्चेत!
5
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
6
अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट, ३० आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या ‘टीव्हीके’सोबत; आज सरकार परीक्षेला सामोरे जाणार
7
आधी दिला इंधन बचतीचा संदेश; आता पीएम मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील वाहने कमी केली
8
सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात वाढ; यातून सरकारला किती फायदा होणार? जाणून घ्या...
9
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
10
पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
11
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
12
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
13
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
15
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
16
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
17
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
18
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
19
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
20
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना ७० टक्के मदतीचे वाटप पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये अतीवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या २० हजार शेतकर्यांना शासनाने जाहिर केलेली मदत वाटप करण्यात नंदुरबार जिल्हा प्रशासन नाशिक विभागात पुढे आहे. आतापर्यंत तब्बल ६९ टक्के मदतीचे वाटप पूर्ण करण्यात आली आहे.     
 गेल्या वर्षी अतीवृष्टीमुळे कोरड व बागायत क्षेत्रातील १० हजार शेतकर्यांच्या शेती उत्पादनांचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंचनामे करुन ३३ कोटी १३ लाख २३ हजार रूपयांच्या रकमेची मागणी केली होती. या मागणीनुसार शासनाने गेल्या महिन्यात जिल्ह्यासाठी १६ कोटी ५६ लाख ६१ हजार ५०० रूपयांचा निधी मंजूर करुन वितरण केले होते. या मदतीचे वितरण सध्या तालुकास्तरावर सुरू आहे. यांतर्गत आतापर्यंत ८ हजार शेतकर्यांना ११ कोटी रूपयांची मदत देण्यात आली असून उर्वरित शेतकर्यांना येत्या आठ दिवसात पैसे देण्यात येणार आहे. दरम्यान येत्या २९  सप्टेंबरपूर्वी जिल्ह्याला मंजूर असलेला दुसर्या टप्प्यातील निधी देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. रक्कम वितरणात नंदुरबार जिल्हा नाशिक विभागात पुढे असताना धडगाव आणि तळोदा तालुका प्रशासनाने प्रथम क्रमांक पटकावला  आहे. धडगाव तालुक्यातील १ हजार १०१ शेतकऱ्यांना २० दिवसात ५४ लाख २८ हजार रूपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले. तर तळोदा तालुक्यातील दोन हजार ६६१ शेतकर्यांना दोन कोटी ७६ लाख ११ हजार ९२५ रुपयांच्या मदतनिधीचे वितरण केले आहे. दोन्ही तालुके नेट कनेक्टीव्हीटी व बँकामधील समस्यांसाठी ओळखली जाते. असे असतानाही दोन्ही तालुक्यांनी १०० टक्के मदत वाटप करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच नंदुरबार तालुक्यात २ हजार ४१५ शेतकरी, शहादा १ हजार २७५ तर अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १०१ शेतकऱ्यांना मदत मिळाली असल्याची माहिती आहे. 
 

प्रशासनाने नंदुरबार तालुक्यासाठी ४ कोटी ६९ लाख ३३ हजार ५००, नवापूर ५३ लाख ७१ हजार ५००, शहादा ६ कोटी ९९ लाख ५२ हजार ५००, तळोदा २ कोटी ७६ लाख १२ हजार, अक्कलकुवा १ कोटी ३६ लाख ६४ हजार तर धडगाव तालुक्यासाठील ५४ लाख २८ हजार रूपयांच्या निधीचे वितरण केले होते. तहसील कार्यालयांकडे वर्ग करण्यात आलेली ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यांवर वितरीत करण्याचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले होते. यांतर्गत आजअखेरीस ८ हजार १९९ शेतकर्यांना ११ कोटी ४७ लाख ९९ हजार ८७७ रूपयांचे वाटप पूर्ण करण्यात आले आहेत. यात नंदुरबार ३ कोटी १५ लाख ६१ हजार २०४, नवापूर ३ लाख ३५ हजार ५८०, शहादा ४ कोटी २९ लाख २७ हजार ५७६ तर अक्कलकुवा तालुक्यात ६९ लाख ३५ हजार ५९२ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. 

बँकांमध्ये होवू लागली गर्दी
जिल्हा प्रशासनाने बागायत आणि कोरड अशी वर्गवारी करत निधीचे वितरण केले आहे. परंतु यात नवापूर तालुक्याची पिछेहाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील २८७ कोरडवाहू नुकसान झालेल्या शेतकर्यांना ३ लाख ३५ हजार ५८० रूपयांची मदत दिली गेली आहे. तर एकाही बागायतदार शेतकर्याला मदत मिळालेली नसल्याची माहिती आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार ३९५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेल्या कोरड व २ हजार २८० हेक्टर क्षेत्रातील बागायतदार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यांवर टाकण्यात आलेली ही रक्कम त्यांना प्राप्त झाल्यानंतर काढण्यासाठी गर्दी होत आहे.