शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बदली झालेल्या शाळेवर रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांच्या बदल्या होऊन तीन आठवडे झाले. मात्र, त्यांना अजून बदली ...

तळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांच्या बदल्या होऊन तीन आठवडे झाले. मात्र, त्यांना अजून बदली शाळेवर रुजू होण्यासाठी कार्यमुक्त केले जात नसल्याने या शिक्षकांनी सोमवारी प्रकल्प अधिकाऱ्यांना साकडे घालून तातडीने कार्यमुक्त करण्याची मागणी केली. दरम्यान त्या शाळांवर शिक्षक मिळाल्या बरोबर कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत तळोदा,धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात ४२ शासकीय आश्रमशाळा चलविल्या जात आहेत. या कर्मचाऱ्यांचा बदल्यांची कार्यवाही नाशिक आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून केली जात असते. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी बदल्या रखडल्या होत्या. परंतु शासनाच्या आदेशानंतर यंदा बदल्या करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आदिवासी विकास विभागाने तळोदा प्रकल्पातील २७ शिक्षकांच्या बदल्या इतर शाळांमध्ये केल्या आहेत. या बदल्या २ ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. असे असताना त्यांना तळोदा प्रकल्प प्रशासनाकडून बदली झालेल्या शाळेवर पाठवण्यात आलेले नाही. बदली होऊन तब्बल तीन आठवडे उलटले असताना कार्यमुक्ती बाबत अजूनही कार्यवाही होत नसल्यामुळे या शिक्षकांनी सोमवारी प्रकल्प अधिकारी डॉ. मैनेक घोष यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. एका शाळेवर ड्युटी करूनच तब्बल १२ ते १३ वर्षे झाली आहेत. आता आदिवासी विकास विभागाने आम्हाला न्याय दिला आहे. त्यामुळे आम्हाला नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने रूजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यावर प्रकल्प अधिकारी डॉ. घोष यांनी तुमच्या जागेवर अजूनही शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तेथे शिक्षक आल्याबरोबर तुम्हाला कार्यमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन शिक्षकांना दिले.

आयुक्त कार्यालयाच्या उदासीन भूमिकेबाबत नाराजी वास्तविक आदिवासी विकास विभागाने तळोदा आदिवासी विकास प्रकल्पात आयुक्त कार्यालयाकडून १८ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना संबंधित शाळेवर लगेच रूजू करणे अपेक्षित असताना अजूनही ते शिक्षक तेथे देण्यात आलेले नाही. आयुक्त कार्यालयाच्या अशा उदासीन धोरणाबाबत शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपायुक्त कार्यालयाकडून इकडे दुर्गम भागात बदली झालेले शिक्षक शुद्धीपत्रक काढून लगेच बदली रद्द करतात अथवा सोयीची शाळा बसवून घेतात. त्यामुळे येथील शिक्षकांवर एकप्रकारे अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे.

अशा शिक्षकांच्या पगार बंद करण्यात यावा

नाशिक आदिवासी विकास विभागामार्फत दरवर्षी तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांमध्ये तिकडील शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात बदली झालेले हे शिक्षक येथे रूजू होत नाही. त्यामुळे प्रकल्पातील बदली झालेल्या शिक्षकांना त्याची झळ सोसावी लागत असते. आदिवासी विकास विभागाच्या अशा धोरणामुळे तळोदा प्रकल्पातील अनेक शाळांमध्ये पदे रिक्त झालेली आहेत. साहजिकच नाशिक आदिवासी विकास विभाग याला जबाबदार असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. जे शिक्षक बदली झालेल्या शाळांवर रूजू होणार नाही अशा शिक्षकांचा पगार बंद करण्यात यावा, अशी मागणी देखील प्रकल्प अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.

एटीसी कार्यालयाकडून तळोदा प्रकल्पातील शासकीय आश्रम शाळांवर बदली झालेल्या शिक्षकांच्या जागेवर दुसरे शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे पुरेशा शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. तेथे शिक्षक आल्याबरोबर यांना कार्यमुक्त करण्यात येईल.

- डॉ मैनेक घोष, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा