शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराचे अनुदान पालकांच्या बँक खाती जमा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST

मागील वर्षी कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार न देता कोरडा शिदा वाटप करण्यात येत होता. भारत सरकारच्या निर्देशानुसार ...

मागील वर्षी कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार न देता कोरडा शिदा वाटप करण्यात येत होता. भारत सरकारच्या निर्देशानुसार सन २०२०-२१ या वर्षातील सुटीच्या कालावधीतील पोषण आहाराअंतर्गत कोरडा शिदा वाटप न करता त्याऐवजी सुटीतील कालावधीतील म्हणजे एप्रिल व मे महिन्यांचे शालेय पोषण आहाराचे अनुदान डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खाती टाकण्याबाबत शिक्षण संचालक, प्राथमिक यांनी निर्देश दिले आहेत.

विद्यार्थ्यांची खाती उघडून ते आधार कार्डशी लिंक करण्याबाबत शिक्षण संचालक, पुणे कार्यालयाकडून निर्देश प्राप्त झालेले आहेत. कोरोनाची जागतिक महामारीची महाभयंकर परिस्थिती असतांना डेल्टासारख्या व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टी विचारात घेता बँकेत खाते उघडणे जिकरीचे ठरणारे आहे. शिवाय उन्हाळी सुट्टीतील अनुदान हे खाते उघडण्यासाठी लागणाऱ्या रकमेपेक्षा अंत्यत कमी स्वरूपाचे आहे. हा आर्थिक भुर्दंड पालकांना सोसावा लागणार आहे. शिवाय अनेक पालक हे ग्रामीण भागात मजुरीवर काम करतात. बँक खाते उघडण्यासाठी त्यांना बँक असणाऱ्या मोठ्या गावात जाऊन स्वतःचा रोजगार बुडवून खाते उघडण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लहान बालकांवर मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे वारंवार आरोग्य मंत्रालयाकडून सूचित केलेले असताना बँकेत खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष घेऊन जाणे, बँकेत गर्दी निर्माण करणे, आरोग्याच्या दृष्टीने अहितकारक आहे. पालकांच्या बँक खाती शालेय पोषण आहाराचे अनुदान डीबीटीद्वारे जमा करण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने ई-मेलद्वारे दिलेल्या निवेदनात केलेली आहे.

"कोरोना काळात रोजगार बुडालेला असताना दोनशे ते अडीचशे रुपये मानधनाकरिता नव्याने विद्यार्थ्यांची बँक खाती उघडणे व ते आधारशी लिंक करणे हे आर्थिकदृष्ट्या पालकांना न परवडणारे आहे. याकरिता यापूर्वीची असलेली आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेची बँक खाती किंवा पालकांचे वैयक्तिक खाते ग्राह्य धरण्यात यावे. शासनाने पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत आलेल्या लाभाच्या प्रत्येक योजना या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न शिक्षकांनी केलेला आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनानेदेखील नंदुरबार जिल्ह्याची परिस्थिती विचारात घेता सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती शिक्षकांनी केली आहे."