शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीतील शेतकऱ्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:17 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता व कोरोना ...

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया निवडणूक आचारसंहिता व कोरोना महामारीमुळे आठ महिने उशिरा होत असल्याने या वाढीव काळातील कर्जावरील व्याज शेतकऱ्यांना भरावे लागणार नाही़ रिझर्व्ह बँकेच्या संकेतानुसार शासनानेच निर्णय घेतल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच शेतकºयांसाठी कर्जमाफीची योजना राबविली़ तथापि योजनेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका व त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूका लागल्या होत्या़ यामुळे या निवडणूक आचारसंहितेच्या कारणाने नंदुरबारसह गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, नांदेड व नाशिक या सहा जिल्ह्यातील प्रक्रिया लांबली़ परिणामी तीन लाखापेक्षा अधिक शेतकºयांची कर्जमाफी रखडली होती़ नंदुरबार जिल्ह्यातील त्यात २७ हजार शेतकºयांचा समावेश होता़ निवडणूका पूर्ण होत नाही तोच कोरोना महामारीची समस्या निर्माण झाल्याने ही प्रक्रिया पुन्हा लांबली़ दरम्यान खरीप हंगाम सुरू झाल्याने कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकºयांना तांत्रिक कारणाने नवीन कर्ज मिळू शकत नव्हते़ त्यामुळे शेतकºयांच्या तक्रारी वाढल्या त्याची दखल घेत शासनाने कर्जमाफीची प्रक्रिया सध्या सुरू केली आहे़
नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १०० कोटी रुपयांची रक्कम कर्जमाफीसाठी प्राप्त झाली आहे़ बँकांकडे रक्कम जमा झाल्यानंतर प्रक्रिया एक दोन दिवसात सुरू होणार आहे़ ही प्रक्रिया सुरू होत असताना अनेक शेतकºयांनी बँकांकडे संपर्क साधला़ त्यावेळी बँकांकडून अतिरिक्त कर्जाचा प्रश्न उपस्थित केला गेला होता़ कारण शासनाने ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची मुदत लक्षात घेऊन कर्जमाफीची रक्कम ठरविली होती़ प्रत्यक्षात योजना अंमलबजावणीला विलंब झाल्याने ९ महिने अतिरिक्त झाले़ या ९ महिन्यांचे व्याज कोणी भरावे ? हा प्रश्न निर्माण झाला होता़ त्यामुळे शेतकºयांमध्ये पुन्हा चलबिचल सुरू झाली़ तथापि त्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकºयांकडून अतिरिक्त व्याज आकारु नये असे शासनाच्या सूचना असल्याने आता अतिरिक्त व्याज शेतकºयांना भरावे लागणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़


कर्जमाफीची योजना सप्टेंबर २०१९ अखेरची रक्कम ठरवून करण्यात आली होती़ त्यामुळे पुढील व्याजाचा प्रश्न जरूर निर्माण झाला होता़ परंतु रिझर्व्ह बँकेनेच हे व्याज शेतकऱ्यांकडून बँकांनी आकारू नये अशी मार्गदर्शक सूचना केली आहे़ त्यामुळे जिल्हा बँकेंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे़ त्या शेतकºयांना अतिरिक्त व्याजाची रक्कम भरावी लागणार नाही़
-धीरज चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी,
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक़