शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात पिकांची स्थिती गंभीरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:33 IST

शहादा : तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ८६ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. ...

शहादा : तालुक्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने ८६ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु वातावरणात बदलांमुळे पाऊस पडूनही ही पिके धोक्यात आली असल्याचे दिसून आले आहे. उत्पन्नाची हमी देणाऱ्या बागायती पिकांत विविध रोगांनी शिरकाव केल्याने शेतकऱ्यांना उत्पन्नाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहादा तालुक्यात यंदा जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले. त्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता तरीही काही शेतकऱ्यांनी आशेवर पेरणीची सुरुवात केली होती. पावसाने ओढ दिल्याने पेरणी वाया गेली. ऑगस्टमध्ये बरसलेल्या पावसावर सर्वत्र पेरणी झाली. पेरणीनंतर पुन्हा पावसाने दडी मारल्याने कोवळी पिके तीव्र उन्हामुळे अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र तालुक्यातील काही भागात होते. गत तीन दिवसात तालुक्यात पाऊस कोसळत असला तरीही पूर्ण क्षमतेने पाऊस कोसळला नसल्याने पिकांची योग्य तशी वाढ होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे उत्पादित मालाला भाव नव्हता. त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले होते. शेतात उत्पादित झालेला माल लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विकावा लागला. परिणामी उत्पादन खर्च अधिक झाल्याने खर्चही निघाला नाही. यंदा वरुणराजा चांगला बरसेल, या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, परंतु उशिराने आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचाच सामना करावा लागत असल्याचे चित्र आजतरी तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यात यंदा बागायतदार शेतकऱ्यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी नुकसान होत आहे. पाऊस नसताना कापूस पिकावर लाल्या आल्याचे शेतकरी सांगत होते. यामुळे तालुक्यात कृषी विभागाने संपर्क करून माहिती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात बागायतदार पिकांचे क्षेत्र हे यंदाही चांगले आहे. यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

n तालुक्यात यंदा बागायतदार शेतकऱ्यांनी ऊस व पपईची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. उसावर पायरिया तर पपईवर विविध विषाणूजन्य आजारांनी शिरकाव केल्याने शेतकरी नुकसान होत आहे. पाऊस नसताना कापूस पिकावर लाल्या आल्याचे शेतकरी सांगत होते. यामुळे तालुक्यात कृषी विभागाने संपर्क करून माहिती घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यात बागायतदार पिकांचे क्षेत्र हे यंदाही चांगले आहे. यामुळे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कडधान्य पिकांमध्ये यंदा घट

nयंदा तालुक्यात १० हजार ९७४ हेक्टर तृणधान्य तर तीन हजार ५४ हजार हेक्टरवर कडधान्यांचा पेरा आहे. ९ हजार १७९ हेक्टरवर गळीत धान्य तर ७१ हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. जून महिन्यात पाऊसच न बरसल्याने कडधान्य पेरण्या अनेकांनी थांबवल्या होत्या.

nदुसरीकडे बागायती पिकांचा आढावा घेतला असताना तालुक्यात ५ हजार १९३ हेक्टरवर ऊस, ३ हजार ९४४ हेक्टरवर केळी, ४ हजार १११ हेक्टर पपई तर १ हजार ३६० हेक्टरवर मिरची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यात १५७ हेक्टरवर इतर भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे.