शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट टळले; शेतकरी सुुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शुक्रवारी सायंकाळपासून पहाटेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शुक्रवारी सायंकाळपासून पहाटेपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळली आहे. शेतकऱ्यांनी १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतेत होते. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून आता १०० टक्के पेरण्या पूर्ण होतील.शहादा तालुकाशहरासह परिसरात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह दीड-दोन तास मुसळधार पाऊस झाला. शहरातील गल्लीबोळांमध्ये व नवीन वसाहतींमध्ये पाण्याचे तलाव साचले. ग्रामीण भागातही चांगला पाऊस झाला. या पावसामुळे कापूस, सोयाबीन यासह खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. या पावसामुळे शहर व तालुक्यात कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती आहे.शुक्रवारी दिवसभर कमालीचा उकाडा होता. रात्री आठ वाजता अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तीन तास संततधार सुरू होती. पंचायत समितीच्या कार्यालय आवार, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, शासकीय विश्रामगृह, भाजी मार्केट परिसरासह नवीन वसाहतींमध्ये पाणी साचले होते. साईबाबा नगरातील तीन ते चार घरांमध्ये पाणी शिरले. डोंगरगाव रस्त्यावरील पाट भरून वाहत होता. शहरातील वीजपुरवठा चार तास खंडित झाला होता. शहादा नगरपालिकेच्या नियोजित ट्रक टर्मिनल जागेवर पाणी साचल्याने तात्पुरते सुरू असलेले भाजीपाला मार्केटमधील विक्रेत्यांना अडचणीचे ठरत आहे. शनिवारी सकाळी किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी प्रेस मारुती मंदिर रस्त्यावर व खरेदी-विक्री संघाजवळ असलेल्या पालिकेच्या मार्केटलगत भाजीपाला विक्री सुरू केली. पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या भागात पावसाचे पाणी साचल्याने तेथील नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही अवघड होत आहे. पाणी साचल्याने दुर्गंधी पसरुन डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.तालुक्यातील पाडळदा, वैजाली, म्हसावद, मंदाणे, सारंगखेडा, मोहिदे, जयनगर, कहाटूळ, कौठळ, कुकावल, कोठली, शिरुड, वरूळ कानडी परिसरातही चांगला पाऊस झाला. गोमाई, वाकी, सुसरी व कन्हेरी या नद्या दुथडी भरून वाहायला लागल्या. या पावसामुळे आता १०० टक्के पेरण्या होतील. शनिवारी सकाळी शहादा शहरात शेती उपयोगी वस्तू खरेदीसाठी शेतकºयांनी मोठी गर्दी केली होती. खते व बियाण्यांच्या दुकानांवरही गर्दी झाली होती.शहादा-प्रकाशा मार्गावर करजई, बुपकरी व डामरखेडा गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याने अनेक वाहने रस्त्यावर टाकलेल्या मातीचा चिखल झाल्याने वाहनांची चाके घसरली होती. काही ठिकाणी ठेकेदाराने खड्डे न भरल्याने ते दिसत नव्हते, मोटारसायकल स्वार त्यात जाऊन पडत होते. रात्रीच्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने अवजड वाहन चालकांना वाहन बाहेर काढणे अवघड जात होते. लगतच असलेल्या दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. ग्रामस्थांनी स्वत: बॅटरी लावून वाहनांना रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांची शेतकºयांनी लागवड केली होती. त्यानंतर पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर आले होते. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसामुळे हे संकट टळले.कळंबू परिसरात समाधानगेल्या १० ते १२ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले. १२ जून रोजी पावसाने परिसरात हजेरी लावली होती. या पावसावरच शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापूस व मका पिकाची लागवड केली होती. परंतु त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकºयांसमोर दुबार पेरणी व लागवडीचे संकट निर्माण झाले होते.मोठा खर्च करून जगविलेले पिके पाऊस वेळेवर न आल्यास वाया जातील की काय ही चिंता शेतकºयांना सतावत होती. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता कळंबूसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.वैंदाणे परिसरनंदुरबार तालुक्यातील वैंदाणे परिसरात शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. तासभर झालेल्या या पावसामुळे शेतातील बांध फुटून पाणी बाहेर पडत होते. पावसाने दडी मारल्याने शेतकºयांना पावसाची प्रतीक्षा लागली होती.