शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

ग्रामपंचायतींवर वर्चस्वाचे दावे-प्रतिदावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 1:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली असून निकाल जाहीर होताच सर्वच पक्षांतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी झाली असून निकाल जाहीर होताच सर्वच पक्षांतील नेत्यांनी ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे. जिल्ह्यात विशेषत: कॅांग्रेस, शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी कॅांग्रेस या चार पक्षात सर्वच ठिकाणी लढती होत्या. या चारही पक्षातील जिल्हा प्रमुखांनी विजयाचे दावे, प्रतीदावे केले असून त्यामुळे राजकारणाला वेगळा रंग आला आहे. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार आपापल्या नेत्यांच्या कार्यालयात जाऊन आनंदोत्सव साजरा करीत होते. 

निम्मेपेक्षा अधीक ग्रा.पं.वर भाजपचे वर्चस्व

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने महाविकास आघाडी सरकारवर नाराजी दर्शविली आहे. या सरकारची निष्क्रीयता, भ्रष्टाचार  व विकास शुन्य कारभाराला जनता कंटाळली आहे. त्याचेच या निकालातून चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला चांगले यश मिळाले असून जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या निम्मेपेक्षा अधीक ग्रा.पं.वर भाजपला यश मिळाले आहे.    -विजय चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष.

आगामी निवडणुकांसाठी पक्षासाठी शुभसंकेत

गामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने चांगली लढत दिली. नंदुरबार आणि धडगाव तालुक्यात पक्षाला चांगले यश मिळाले असून अक्कलकुवा तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायतही शिवसेनेला मिळाली आहे. आगामी काळात सर्वच ठिकाणी भगवा फडकविण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.        -डॅा.विक्रांत मोरे,  जिल्हाप्रमुख, शिवसेना.

ग्रामीण मतदार पुन्हा कॅांग्रेसच्या बाजुनेच 

जिल्ह्यातील जनता नेहमी कॅांग्रेसच्या पाठीशी असते हे या निवडणुकीतून पुन्हा सिद्ध झाले आहे. नवापूर आणि धडगाव तालुक्यात कॅांग्रेसचे आमदार असून तेथे पक्षाला मोठे यश मिळाले आहे. याशिवाय इतर ठिकाणीही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी जिल्ह्याला चांगला न्याय दिला त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला यश मिळाले आहे.           -दिलीप नाईक,   कार्याध्यक्ष, कॅांग्रेस.