शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वालंबातील बालकांची अंगणवाडीत जाण्यासाठी नदीतील पाण्यातून कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा ...

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नाही. त्यामुळे या पाड्यावरील लहान चिमुकल्या मुलांना व स्तनदा माता, गरोदर माताना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्यामध्ये येणाऱ्या नदीवर पुल नसल्याने नदीतूनच चौपलाईपाडाच्या अंगणवाडी केंद्रात जावे लागत आहे. या वेळी डोंगर दºयातील पाणी अचानक नदीला येवून धोकेदायक ठरू शकते तरी वालंबाच्या कारभारी पाड्यासाठी स्वतंत्र अंगणवाडी केंद्राला मंजुरी देवून ती अंगणवाडी सुरू करण्यात ची आवश्यकता आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील वालंबा गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र नसल्याने येथील लहान मुलांना, स्तनदा माता व गरोदर माता, किशोर वयीन मुलीना दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील चोपलाईपाडा अंगणवाडी केंद्रात जावे लागते. या कारभारी ते चोपलाईपाडा दरम्यान नदी येत असून, या नदीवर पुल नसल्याने नदीच्या पाणीमधून लहान मुले जात असताना डोंगराºयात जास्त पाऊस होवून अचानक नदीत पाणी वाढल्यास धोकेदायक ठरू शकते. तरी वालंबाच्या कारभारीपाडा येथे अंगणवाडी केंद्र सुरू झाल्यास कारभारी पाड्यातील शून्य ते सहा वयोगटातील ३८ ते ४० लहान चिमुकल्यांना स्तनंदा व गरोदर माताना सोयीचे होणार आहे. तरी वालंबाच्या कारभारी येथे अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सातपुड्यातील दुर्गम अति दुर्गम भागातील गावांचे पाडे पाच ते सात किलोमीटर अंतरावर विस्तारलेले आहेत. अनेक ठिकाणी शाळा आणि अंगणवाडी केंद्र नसल्याने तेथील बालकांना लगतच्या पाड्यातील शाळेत अथवा अंगणवाडीत जावे लागते. एका पाड्याहून दुसºया पाड्यावर जाण्यासाठी बहुतांश ठिकाणी रस्तेही नाही. पाय वाटेनेच डोंगराचा चढाव चढून अनेक ठिकाणी नदी नाले ओलांडून जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात ते धोकेदायक ठरते. त्यामुळे याबाबतचे योग्य सर्वेक्षण होवून दुर्घटना टाळण्यासाठी नियोजन होणे आवश्यक आहे.