शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसांपासून बलवंड परिसर अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:29 IST

आधीच अवकाळी पावसाने बलवंड परिसरातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात राहिलेली पिके शेतकरी वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोरतलाव शिवारातील दोन ...

आधीच अवकाळी पावसाने बलवंड परिसरातील शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात राहिलेली पिके शेतकरी वाचविण्याच्या प्रयत्नात असताना बोरतलाव शिवारातील दोन ट्रान्सफाॅर्मर जळाल्याने शेतक-यांच्या मागील संकटांची मालिका सुरूच आहे. गत आठवडाभरापासून नवीन ट्रान्सफाॅर्मर मिळविण्यासाठी शेतकरी वीजमंडळाच्या कार्यालयात घिरट्या घालत असून त्यांंची आर्त हाक कोणीही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. परिणामी, पाण्याअभावी उभी पिके डोळ्यांदेखत जळण्याच्या मार्गावर आहेत. आधीच निसर्गाच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी वीजमंडळाच्या आडमुठ्या धोरणामुळे संताप व्यक्त करीत आहे. आधी वीजबिल भरा, मग ट्रान्सफाॅर्मर मिळेल, या वीजमंडळाच्या धोरणामुळे शेतकरी पुन्हा एकदा कचाट्यात सापडला असून आम्हास कोणीही वाली उरला नाही, अशी भावना शेतक-यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांत ट्रान्सफाॅर्मर बदलून मिळाला नाही तर नंदुरबार वीजमंडळ कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

शासनाने तीन वर्षांपासून कृषी वीजबिले देणे बंद केले आहे. म्हणून बिले भरावी, तर कशी आणि किती. आधी शेतीला २४ तास वीज द्या, मगच वीजबिल मागा.

-बाजीराव पाटील, शेतकरी, बलवंड