शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

मिरची पथारींना आले तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसामुळे महिनाभरात दोन वेळा मिरची उत्पादक व व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. नंदुरबारातील शेकडो ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पावसामुळे महिनाभरात दोन वेळा मिरची उत्पादक व व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले. नंदुरबारातील शेकडो एकर मिरची पथारींवर तलाव साचला असून मिरची पाण्याखाली गेली आहे. यामुळे यंदा मिरची प्रक्रिया उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात      आहे. नंदुरबारसह जिल्ह्यात महिनाभरात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झाला   आहे. तीन आठवड्यापूर्वी झालेल्या पावसात देखील शेती व पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आताच्या पावसाने देखील तीच पुनरावृत्ती झाली असून यावेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पथारींना आले तलावाचे स्वरूपशहरातील होळ शिवार व चौपाळे शिवारात शेकडो एकर परिसरात मिरची पथारी आहेत. त्या ठिकाणी तीन महिन्यांपासून मिरची सुकविण्यासाठी टाकल्या जात आहेत. होळ शिवारातील परिसर हा काळ्या मातीचा तर चौपाळे शिवारातील परिसर हा मुरूम असलेला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास होळ शिवारातील परिसरात मोठे नुकसान होते. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे देखील या ठिकाणी तलाव साचला. काळी माती असल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले. त्यामुळे मिरच्या पाण्याखाली गेल्या तर काही चिखलात दाबल्या गेल्या. त्यामुळे मिरची सडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून व्यापारींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.वाचविण्याचा प्रयत्नमिरची पावसापासून वाचविण्यासाठी व्यापारींनी अनेक प्रयत्न केला, परंतु उपयोग झाला नाही. मिरचीच्या ढिगाऱ्यावर प्लॅस्टिक कागद अंथरणे, गोणीमध्ये भरून ठेवणे अशा उपाययोजना केल्या, परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण पावसाचा जोर जास्त असल्यामुळे या उपाययोजना तोकड्या ठरल्या. साठवणुकीसाठी सोय नाहीमिरची साठवणुकीसाठी व्यापारींकडे पुरेशी सोय नाही. पथारींवर वाळलेल्या मिरच्या या शहरातील कोल्ड स्टोरेजमध्ये साठविल्या जातात. प्रक्रीयेसाठी जेंव्हा त्यांची गरज पडते त्यावेळी त्या तेथून काढल्या जातात. काही उद्योजकांचे खाजगी गोडावून आहेत. परंतु त्यांची साठवण क्षमता कमी असल्यामुळे ओली मिरची तेथे ठेवता येत नाही. त्यामुळे पथारींवरच वाळवून ती न्यावी लागते. अशा स्थितीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागते.शेतातही मोठे नुकसानशेतात असलेल्या मिरचीचीहे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे मिरीचीची झाडे कोलमडली. त्यामुळे पाणी आणि गाऱ्यात ते रुतल्यामुळे आता सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. आधीच मिरचीला भाव कमी असतांना या आपत्ती येत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.