लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : एटीएमची सेवा घेणाºया बॅँक ग्राहकांसाठी चेहरा उघडा ठेवावा असा नियम करण्यात आले आहे. त्यामुळे एटीएम सेंटरवर जाणाºया प्रत्येक ग्राहकाला उघडे ठेवणे अनिवार्य असते. परंतु सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत मास्क बांधणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे एटीएममधून सेवा घेणारे ग्राहक कोंडीत सापडले आहे. कोरोनामुळे एटीएमवरील सूचना बदलणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे, शिवाय अनेक ग्राहक एटीएमचा वापर करीत असल्याने प्रत्येक सेंटरवर सॅनेटायझर ठेवण्याची मागणीही करण्यात येत आहे.कोरोनोच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. रविवारच्या सुटीमुळे एटीएमच्या बाहेर नागरिकांच्या रांगा दिसून येत आहे. परंतु बँकांसह कुठल्याही यंत्रणांकडून गर्दी कमी करण्याच्या उपाययोजनाच करण्यात आल्या नाही. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाणाºया ग्राहकांना बटन दाबणे, बोट ठेवणे यातून मशिनला स्पर्श करावाच लागतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याच एटीएमवर सॅनिटायझर्सची व्यवस्था करण्यात आली नाही.याउलट एटीएम च्या कक्षात येताना तोंडाला रुमाल, स्कार्प व मास्क लाऊ नये अशा सूचना जशाच्या तशा आजही आहेत. सर्वच ठिकाणी खोकताना, शिंकताना तोंडाला रुमाल लावा अथवा मास्कचा उपयोग करावा अशी जनजागृती होत आहे, असे असतांना एटीएम मशीनच्या बाबतीत विरोधाभास दिसून येत आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी कोरोना पसरण्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी बँकाना न योग्य त्या उपाययोजना करण्यास निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
संपूर्ण जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. बहुतांश नियमही बदलले. परंतु बॅँकांकडून वेळचे नियम वगळता कुठलाही बदल केला नाही. प्रत्येक सूचना देखील जुन्याच दिसून येत आहे. त्यामुळे बॅँक ग्राहक नाराची सर्वत्र व्यक्त करीत आहे.