शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याच्या विश्रांतीनंतर जयनगरसह परिसरात पाऊस,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST

महिन्याच्या विश्रांतीनंतर जयनगरसह परिसरात पाऊस, खरीप पिकांना जीवदान जयनगर : जिल्ह्यासह जयनगर परिसरात जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. ...

महिन्याच्या विश्रांतीनंतर जयनगरसह परिसरात पाऊस,

खरीप पिकांना जीवदान

जयनगर : जिल्ह्यासह जयनगर परिसरात जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा सुखावला असून आता पुन्हा पिकांना रासायनिक खते द्यायला तसेच औषधफवारणी कामांना वेग येणार आहे. त्यामुळे मजूरवर्गालाही रोजगार मिळणार आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी दोन-अडीच वाजेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. रात्रीही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वच घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सलग दोन वर्षे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली होती. मात्र, मागील दोन महिन्यांत अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी व लागवड केली होती. जिल्ह्यात कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, मुगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जवळपास महिनाभरापासून पावसाच्या विश्रांतीमुळे पिके करपू लागली होती. मात्र, मंगळवारी दुपारी सर्वत्र दोन वाजेच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात रिमझिम तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी पिके धरून ठेवत होती. मात्र, आलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले, तरी उत्पादनात निश्चितच घट होणार आहे.

रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी पाऊस लांबल्याने यापुढे सरासरीएवढा पाऊस झाला, तरच विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.

जयनगरसह परिसरात अद्याप नद्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे परिसरातील विहिरींना तसेच कूपनलिकांना पाणीपातळीत वाढ दिसून येत नाहीय. म्हणून आगामी दीड महिन्याच्या पावसावर शेतकऱ्यांचे खरीप तसेच रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.