शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST

नंदुरबार : गेल्या दोन वर्षांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून ...

नंदुरबार : गेल्या दोन वर्षांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात जिल्हा प्रशासन इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडीवर राहिले. दोन वर्षांत तब्बल ३० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ही मदत मिळाली असून, तिचा आकडा जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यात २०१९ व २०२० मध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबत भरपाईसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात आले होते. २०१९ च्या नुकसान भरपाईची रक्कम कोरोनामुळे काहीकाळ लांबली होती. परंतु लॅाकडाऊन शिथिल होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली. दोन वर्षांत तब्बल ३० हजार शेतकऱ्यांना २५ कोटींपेक्षा अधिक रक्कम दिली गेली आहे. ऐन कोरोनाकाळातील अडचणीच्या वेळी ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडल्याने मोठा आधार मिळाला होता.

जुलै ते ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीबाबत १२ हजार १५० शेतकऱ्यांना १६ कोटी ५२ लाखांची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात दोन हजार ७५४ शेतकऱ्यांना ४ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वाटप करण्यात आली. नवापूर एक हजार १३५ शेतकऱ्यांना ५३ लाख ६८ हजार रुपयांची नुकसानभरपाई, शहादा तालुक्यातील तीन हजार ३६१ शेतकऱ्यांना सहा कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम वाटप झाली. तळोदा तालुक्यात दोन हजार ६९९ शेतकऱ्यांना दोन कोटी ८३ लाख रुपयांची रक्कम देण्यात आली. अक्कलकुवा तालुक्यात एक हजार १०० शेतकऱ्यांना ९६ लाख ३४ हजार आणि धडगाव तालुक्यात एक हजार १०१ शेतकऱ्यांना ५४ लाख २८ हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले.

जुन ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत जिल्ह्यातील १६ हजार १२४ शेतकऱ्यांना आठ कोटी ६० लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात ४७२ शेतकऱ्यांना ३२ लाख पाच हजार रुपये मदत, नवापूर तालुक्यातील चार हजार ८३६ शेतकऱ्यांना एक कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम, शहादा तालुक्यातील एक हजार २९९ शेतकऱ्यांना ९० लाख ४८ हजार रुपयांची, तळोदा तालुक्यात ९०४ शेतकऱ्यांना ४४ लाख ७८ हजार रुपयांची, अक्कलकुवा तालुक्यात दोन हजार ३६४ शेतकऱ्यांना एक कोटी २८ लाख आणि अक्राणी तालुक्यात सहा हजार २४९ शेतकऱ्यांना चार कोटी सात लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले.

उर्वरित शेतकऱ्यांनादेखील मदत वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते लवकरच पूर्ण होणार असून, बाधित १०० टक्के शेतकऱ्यांना ही रक्कम मिळवून देण्यात जिल्हा आघाडीवर राहणार आहे.