शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

पार्डी-देळूब पुलामुळे होणार शेतकऱ्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:03 AM

अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़

ठळक मुद्देपावसाळ्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला होणार पूल

पार्डी : अर्धापूर तालुक्यातील देळूब बुग़ावाला जोडणारा पूल गेल्या काही वर्षांपासून मोडकळीस आल्याने पुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती़ पार्डी-देळूब बु़, देळूब खु़, भोगाव या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे़ हा पूल पावसाळ्याअगोदर वाहतुकीसाठी खुला होणार आहे़ हा पूल पावसाळ्यात देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी परिसरातील शेतकऱ्यांना मालाची ने-आण करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे़देळूब गावाला जोडणारा पूल मोडकळीस आलेला होता़ पावसाळ्यात हा पूल वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात होती़ पुलावर सुरक्षेसाठी कठडे नसल्याने या पुलावर नेहमीच अपघात होत होते़ तसेच पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहत होते़ त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती़ या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने या पुलावरील दळणवळण व्यवस्था संपूर्ण ठप्प होत होती़देळूब गावाच्या पुलावरून शेतकºयाच्या मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने पावसाळ्यात शेतकºयांना अनेक गोष्टींचा अडथळा निर्माण होत होता़ तसेच या गावांना दुसरा मार्ग नसल्याने हाच पूल नागरिकांसाठी जाण्या येण्यासाठी होता़ त्यामुळे या पुलावर नेहमीच वर्दळ राहत असे़ परंतु, हा पूल संपूर्ण मोडकळीस आल्याने गावकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असे़या पुलाच्या बांधकामासाठी गावकºयांनी व विद्यार्थ्यांनी वेळोवेळी मागणी करून केली होती़ शासनाने देळूब पुलाच्या बांधकामाची परवानगी दिली होती़ या पुलाचे बांधकाम जानेवारी महिन्यात सुरु झाले होते़ पुलाचे बांधकाम पूर्ण प्रगतीपथावर सुरू आहे़ पुढील महिन्यात पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी कामगार रात्रं-दिवस काम करीत आहे़ दरम्यान, इसापूर धरणातून महिन्याच्या अंतराने पार्डी नदीला पाणी सोडण्यात येत असल्याने बाधकामास व्यत्यय येत असून पुलाच्या बांधकामास उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे़पुलाचे बांधकामुळे देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी शिवारातील शेतकºयांना दिलासा मिळणार आहे़ या पुलाच्या बांधकामुळे पावसाळ्यात होणाºया अनेक अडचणीचा सामना करावा लागणार नाही़ विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग सोयीस्कर पडेल़ देळूब ,भोगाव येथील जि़ प़ शाळा नावालाच असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते़ पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले होते़ परंतु, पुलाचे बांधकाम केल्याने विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीस्कर होणार आहे.एकमेव पूलदेळूबच्या पुलावरून शेतकºयाच्या मालाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते, मात्र पावसाळ्यात अडचणीचा समना करावा लागत होता़ या गावांना दुसरा मार्ग नसल्याने हा पूल एकमेव होता़ त्यामुळे पुलावर नेहमीच वर्दळ राहत असे़ पूल संपूर्ण मोडकळीस आल्याने गावकरी, शेतकरी व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असे़पुलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची होणार सोयपुलाचे बांधकामामुळे देळूब बु़, देळूब खु़, भोगाव व पार्डी शिवारातील शेतक-यांना दिलासा मिळणार आहे़ या पुलाच्या बांधकामामुळे पावसाळ्यात होणा-या अनेक अडचणीचा सामना करावा लागणार नाही़ विद्यार्थ्यांसाठी हा मार्ग सोयीस्कर पडेल़ पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते़ परंतु, पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले होते़ परंतु, या पुलाचे बांधकाम केल्याने विद्यार्थ्यांना हा मार्ग सोयीस्कर होणार आहे़

टॅग्स :Nandedनांदेडroad transportरस्ते वाहतूक