शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात केवळ दीड टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:48 IST

पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़

ठळक मुद्देबँक अधिकाऱ्यांची उदासिनता पेरणीपूर्व पीककर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना ठरेल लाभदायी

श्रीनिवास भोसले।नांदेड : पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़ परंतु, शेतक-यांकडे बँक अधिका-यांचा पाहण्याचा दृष्टीकोण आणि उदासिनतेमुळे उद्दिष्ट देवूनही शेतक-यांना कर्ज मिळत नाही़ यंदाच्या खरीप हंगामात आजपर्यंत केवळ १़६३ टक्केच कर्जवाटप झाले आहे़शासनाच्यावतीने शेतक-यांना खरीप, रबी हंगामात पेरणीसाठी लागणारे खत-बी बियाणे खरेदीसाठी पीककर्ज उपबल्ध करून दिले जाते़ परंतू, नांदेड जिल्ह्यातील बँक अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गरज असतांनादेखील शेतकºयांना कर्ज मिळत नाही़ गतवर्षी जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतर बँकानी कर्जवाटपाची गती वाढविली होती़ परंतु, पेरणी करण्यापूर्वीच पीककर्ज उपलब्ध झाले तर त्यांचा शेतक-यांना योग्य फायदा होतो़ परंतु, बँकाच्या दिरंगाईचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो़ बँकाकडे अर्ज करून तसेच बँक अधिका-यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करूनदेखील कर्जासाठी बँकाचे उंबरठे झिजवावे लागतात़ ही परिस्थिती बदलली आणि बँकामधील एजंटांवर अंंकुश मिळविण्यात प्रशासनास यश आले तरच सर्वसामान्य शेतक-यांनी वेळेत पीक कर्ज उपलब्ध होवू शकते़नांदेड जिल्ह्याला यंदाच्या २०१९ - २० खरीप हंगामासाठी १९६७ कोटी ५० लाख ९७ हजार रूपये पीक कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आला आहे़ यामध्ये सर्वाधिक १५११ कोटी ७३ लाख ७४ हजार रूपये उद्दिष्ट व्यापारी आणि खासगी बँकांना दिले आहे़ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १७८ कोटी ६० लाख ४० हजार रूपये तर ग्रामीण बँकेस २७७ कोटी १६ लाख ८३ हजार रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक ११ कोटी ३२ लाख १७ हजार रूपये पीककर्ज २ हजार ६३८ शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे़ त्याची टक्केवारी ६़३४ एवढी आहे़आजपर्यंत साडेचार हजार शेतक-यांना लाभजिल्ह्यातील बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट असूनही पीककर्ज वाटपात आखडता हात घेतल्याचे पहाला मिळत आहे़ आजपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ५८३ शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक २ हजार ६३८ शेतकरी सभासद हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत़ तर १ हजार ९७ शेतक-यांना व्यापारी आणि खासगी बँकानी आणि ग्रामीण बँकेने ८४८ शेतक-यांना पीक कर्ज वाटप केले आहे़ खासगी बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत़पीककर्ज हे पेरणीसाठी दिले जाते़ त्यामुळे पीककर्ज वाटप १५ जूनपर्यंत पूर्ण करायला हवे़ परंतु, बँकाकडून दिरंगाई केली जाते़ त्यामुळे पेरणी काळात शेतक-यांना सावकारी कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही, हे वास्तव आहे़

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरीMONEYपैसा