शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नांदेड जिल्ह्यात केवळ दीड टक्के पीककर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:48 IST

पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़

ठळक मुद्देबँक अधिकाऱ्यांची उदासिनता पेरणीपूर्व पीककर्ज मिळाल्यास शेतकऱ्यांना ठरेल लाभदायी

श्रीनिवास भोसले।नांदेड : पेरणी काळात शेतक-यांना सावकाराचा उंबरठा चढण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाकडून गरजू शेतक-यांना अल्प व्याजदरात पीक कर्ज वाटप करण्यात येते़ विविध बँकांच्या माध्यमातून जिल्ह्याला उद्दिष्ट दिले जाते़ परंतु, शेतक-यांकडे बँक अधिका-यांचा पाहण्याचा दृष्टीकोण आणि उदासिनतेमुळे उद्दिष्ट देवूनही शेतक-यांना कर्ज मिळत नाही़ यंदाच्या खरीप हंगामात आजपर्यंत केवळ १़६३ टक्केच कर्जवाटप झाले आहे़शासनाच्यावतीने शेतक-यांना खरीप, रबी हंगामात पेरणीसाठी लागणारे खत-बी बियाणे खरेदीसाठी पीककर्ज उपबल्ध करून दिले जाते़ परंतू, नांदेड जिल्ह्यातील बँक अधिका-यांच्या उदासिनतेमुळे गरज असतांनादेखील शेतकºयांना कर्ज मिळत नाही़ गतवर्षी जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतर बँकानी कर्जवाटपाची गती वाढविली होती़ परंतु, पेरणी करण्यापूर्वीच पीककर्ज उपलब्ध झाले तर त्यांचा शेतक-यांना योग्य फायदा होतो़ परंतु, बँकाच्या दिरंगाईचा फटका बळीराजाला सहन करावा लागतो़ बँकाकडे अर्ज करून तसेच बँक अधिका-यांनी सांगितलेल्या कागदपत्रांची पुर्तता करूनदेखील कर्जासाठी बँकाचे उंबरठे झिजवावे लागतात़ ही परिस्थिती बदलली आणि बँकामधील एजंटांवर अंंकुश मिळविण्यात प्रशासनास यश आले तरच सर्वसामान्य शेतक-यांनी वेळेत पीक कर्ज उपलब्ध होवू शकते़नांदेड जिल्ह्याला यंदाच्या २०१९ - २० खरीप हंगामासाठी १९६७ कोटी ५० लाख ९७ हजार रूपये पीक कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आला आहे़ यामध्ये सर्वाधिक १५११ कोटी ७३ लाख ७४ हजार रूपये उद्दिष्ट व्यापारी आणि खासगी बँकांना दिले आहे़ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १७८ कोटी ६० लाख ४० हजार रूपये तर ग्रामीण बँकेस २७७ कोटी १६ लाख ८३ हजार रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक ११ कोटी ३२ लाख १७ हजार रूपये पीककर्ज २ हजार ६३८ शेतक-यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वाटप केले आहे़ त्याची टक्केवारी ६़३४ एवढी आहे़आजपर्यंत साडेचार हजार शेतक-यांना लाभजिल्ह्यातील बँकांना कोट्यवधींचे उद्दिष्ट असूनही पीककर्ज वाटपात आखडता हात घेतल्याचे पहाला मिळत आहे़ आजपर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ५८३ शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये सर्वाधिक २ हजार ६३८ शेतकरी सभासद हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत़ तर १ हजार ९७ शेतक-यांना व्यापारी आणि खासगी बँकानी आणि ग्रामीण बँकेने ८४८ शेतक-यांना पीक कर्ज वाटप केले आहे़ खासगी बँका पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत़पीककर्ज हे पेरणीसाठी दिले जाते़ त्यामुळे पीककर्ज वाटप १५ जूनपर्यंत पूर्ण करायला हवे़ परंतु, बँकाकडून दिरंगाई केली जाते़ त्यामुळे पेरणी काळात शेतक-यांना सावकारी कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही, हे वास्तव आहे़

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरीMONEYपैसा