शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आता बैठका, चर्चा नको; कृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:36 IST

जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या.

ठळक मुद्देकाँग्रेस आमदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाजिल्ह्यात दुष्काळ, पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त

नांदेड : जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी टंचाई व खरीप हंगामासंदर्भात मुंबईत बैठक घेतली. बैठका होत असल्या तरीही कृती मात्र होत नसल्याचे दिसत असून प्रशासनाने आता कृती करावी, असे जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी प्रशासनाला सुचवले आहे.मागील अनेक महिन्यांपासून केवळ बैठकांचा ‘फार्स’ चालू आहे. बैठकांवर बैठका घेण्यापेक्षा दुष्काळाच्या भीषण समस्येला तोंड देणाºया नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता बैठका नको तर झालेल्या बैठकांमधील निर्णयावर कृती करा, अशा सूचना जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिल्या आहेत.नांदेड जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अनेक सूचना केल्या आहेत. ज्यामध्ये मागेल त्याला टँकर, नवीन विंधन विहिरी घेणे, जनावरांसाठी चारा छावण्या उभारणे, जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे, रोजगार हमी योजनेची कामे सुरु करणे आदी विषयांवर तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबईत घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीत नांदेड शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता सिद्धेश्वर धरणातील मृतसाठ्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सिद्धेश्वरचे पाणी नांदेडला देण्याचे पाटबंधारे विभागाला आदेश दिले.मुंबई येथे झालेल्या बैठकीतील अन्य काही निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होणे आवश्यक आहे. मुंबईतच पालकमंत्र्यांनी खरीप हंगामासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यात केवळ दीड टक्केच पीककर्ज वाटप झाल्याचे उघड झाले. आम्ही सर्वांनी पालकमंत्र्यांकडे आग्रही भूमिका मांडली. बँक अधिकाºयांची उदासीनता लक्षात आणून दिली. त्यानंतर कर्ज वाटपाची गती वाढविण्यासंदर्भाचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.या सर्व बाबी मुंबई येथील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चिल्या गेल्या असताना आता नव्याने आणखी आमदार व खासदार यांनी बैठका घेण्याची गरज काय? असा सवाल माजी पालकमंत्री व काँग्रेसचे आ. डी. पी. सावंत, आ.वसंतराव चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर यांनी म्हटले आहे.जिल्ह्यात उरला केवळ सहा टक्के जलसाठाजिल्ह्यात लहान-मोठे असे १११ प्रकल्प आहेत. दोन मोठे प्रकल्प असून त्यात मानार आणि विष्णूपुरी प्रकल्पाचा समावेश होतो. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ ०.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. केवळ ०.१८ दलघमी पाणी उरले आहे. मानार प्रकल्पात १०.९७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पांत ५.७६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. उच्चपातळी बंधाºयात ८.९७ दलघमी साठा शिल्लक असून ८ उच्च पातळी बंधारे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील ८८ लघुप्रकल्पांत ५.४५ टक्के म्हणजे १०.४१ दलघमी जलसाठा उरला आहे. या जलसाठ्यावर तहान भागवावी लागणार आहे. नांदेडचा पाणीप्रश्न बिकट बनला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाईNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडcollectorजिल्हाधिकारी