शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातून नुकसानीपोटी तुटपुंज्या निधीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 16:20 IST

प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रूपये अपेक्षित निधी

ठळक मुद्देशेतकऱ्यांमधून नाराजी

नांदेड : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे.  परंतु हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावात दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

आॅक्टोबर महिन्याच्या २० तारखेनंतर बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. त्यापाठोपाठ शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी  मुसळधार पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे हाती आलेले सोयाबीन पावसाने मातीमोल केले. तर शेतातील अवजारांसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून सदर कालावधीत सोयाबीन काढणीला आले होते तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून त्याची वळई लावली होती. सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. परिणामी ढिगारे करुन ठेवलेल्या सोयाबिनच्या वळईचे नुकसान झाले तर ज्वारीच्या कणसाला अंकुर फुटले. सोयाबीन, कापूस या पिकांसह फुलांच्या शेतीचे तसेच भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांच्या मदतीने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आला. परंतु ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांची आकडेवारी शासनदरबारी पाठविण्यात आली आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तूर,मूग आदी पिकांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपये निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत किती मिळेल? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रस्तावानुसार जिल्ह्यात जिरायती पिकाखालील बाधित क्षेत्र ६ लाख ३३ हजार २३१ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ३ लाख ७५ हजार ३७३ हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र आहे तर कापूस २ लाख ४ हजार १६५, मका- ४ हेक्टर, ज्वारी- ३५ हजार ८८४ हेक्टर, तूर- १२ हजार ५००, मूग १२२३ हेक्टर तर ४ हजार ६ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले आहे.  बागायत पिकाखाली भाजीपाला व इतर पिकांसाठी ८ लाख २३ हजार ५०० रुपये निधी अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक ५९ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्या पाठोपाठ १७७ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये  मोसंबी- ७ हेक्टर, आंबा- ६ हेक्टर, चिकू ३ हेक्टर आदी फळबागांचा समावेश आहे. त्यासाठी ३१ लाख ८६ हजार निधी अपेक्षित असून हेक्टरी १८ हजार          रुपये प्रस्तावित केले आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त बाधित क्षेत्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ६ लाख ३३ हजार ४६९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्के व त्यापेक्षा अधिक जास्त नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायत- ६ लाख ३३ हजार २३१ हेक्टर, बागायत- ६१ हेक्टर, फळपिके- १७७ हेक्टर बाधित क्षेत्र आहे. या सर्व पिकांसाठी ४३० कोटी ९९ लाख ८० हजार ३०० रुपये अपेक्षित निधीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे़

धर्माबाद तालुक्यात भाजीपाल्याचे नुकसानधर्माबाद तालुक्यात सर्वाधिक ३७ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ २ हेक्टरवरील केळींचे नुकसान असून प्रती हेक्टरी १३ हजार ५०० निधी अपेक्षित असून एकूण ५ लाख २६ हजार ५०० रुपये अपेक्षित निधी प्रस्तावित आहे. त्याचबरोबर मुखेड तालुक्यात २२ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान असून येथील ३० शेतकऱ्यांना २ लाख ९७ हजार निधी अपेक्षित असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी फळ पिके सोडून जिरायत पिकाखालील क्षेत्रासाठी ४३० कोटी ५९ लाख ७० हजार ८०० रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे प्रस्तावात नमुद केले आहे. त्याचबरोबर बागायत पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रूपये मदत अपेक्षीत असून त्यासाठी ८ लाख २३ हजार ५०० रूपये तर फळ पिकाखालील बाधीत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रूपये मदत प्रस्तावित केली असून त्यासाठी ३१ लाख ८६ हजार रूपयांचा निधी अपेक्षित असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे़ 

८५ हजार शेतकऱ्यांचे दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान४२ हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८५ हजार ८५० असून बाधित क्षेत्र १ लाख ८६ हजार ५४७ हेक्टर आहे. त्याचबरोबर २ हेक्टरपर्यंतचे ६ लाख ३२ हजार २४९ शेतकऱ्यांची ४ लाख ६१ हजार ५३१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मुखेड तालुक्यात ६६ हजार ३८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ हदगाव - ६४ हजार ५००, कंधार तालुक्यात ६४ हजार ३१५, लोहा तालुक्यात ६३ हजार ३५४ त्यापाठोपाठ देगलूर तालुक्यात ४४ हजार ९९०, नायगाव तालुक्यात ४६ हजार ६३३, हिमायतनगर तालुक्यात ३४ हजार ४०५, बिलोली तालुक्यात ३२ हजार ८२६, नांदेड तालुक्यात ३० हजार ६७९, अर्धापूर तालुक्यात २५ हजार २८६, मुदखेड तालुक्यात १६ हजार ९२५, धर्माबाद तालुक्यात २४ हजार २३५, किनवट तालुक्यात ४३ हजार २१५, माहूर तालुक्यात २१ हजार ४०९,  भोकर तालुक्यात ४१ हजार ५०७ तर उमरी तालुक्यात २७ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती