शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

मराठवाड्याला मिळाले हक्काचे ६४ टीएमसी पाणी; नांदेडचे ४० नवे सिंचन प्रकल्पही मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 9:09 PM

मराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागील सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला.

नांदेड -  राज्याच्या हक्काचे तेलंगणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी राज्याच्या व मराठवाड्याच्या हितासाठी पैनगंगेमध्ये उपलब्ध करुन द्यावे, या अनुषंगाने जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavhan) यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.  जलसंपदा विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार १९.२९ टीएमसी पाणी मध्य गोदावरीमध्ये तर ४४.५४ टीएमसी पाणी पैनगंगेमध्ये असे एकूण ६४ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध होणार आहे( Marathwada gets 64 TMC water ) . त्यातूनच नांदेड जिल्ह्यातील ४० नवीन प्रकल्प व पैनगंगेवरील सात उच्च पातळी बंधारे मार्गी लागणार आहेत.

मराठवाड्याला हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळाले पाहिजे. यासाठी मागील सात वर्षपासून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या संदर्भात २६ जून २०२१ रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून मराठवाड्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रश्नाबाबत, भविष्यात हाती घ्यावयाच्या सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यातूनच राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्याला ६४ टीएमसी हक्काचे पाणी उपलब्ध होत आहे.  

४० योजनांसाठी १३५.८० दलघमी पाणीगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने स्थानिक स्तरीय २६ योजना व राज्यस्तरीय १४ योजना अशा एकूण ४० योजनांसाठी १३५.८० दलघमी पाणी वापर प्रस्तावित केलेला आहे. या पाणी उपलब्धतेमुळे नांदेड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भोकर, लोहा, कंधार, मुदखेड, अर्धापूर, नांदेड, देगलूर या तालक्यामध्ये स्थानिक स्तरीय २६ प्रकल्प  हाती घेतले जाणार आहेत. या प्रकल्पांना या पाण्यातून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रस्तावित केलेल्या राज्यस्तरीय १४ योजनांमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, देगलूर, लोहा आणि कंधार या तालुक्यांचा समावेश आहे.

नांदेडसह हिंगोली, यवतमाळलाही फायदापैनगंगा नदीमध्ये उपलब्ध झालेल्या ४४.५४ टीएमसी पाण्यामधून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या खाली निम्न पैनगंगा प्रकल्पापर्यंत ७ नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांसोबतच उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची तूट देखील भरुन निघेल. त्याचा फायदा हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याला होईल. नवीन सात उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिलेले आहेत. यामध्ये हदगाव तालुक्यातील पांगरी साप्दी (९.८० दलघमी), गोजेगाव (१३ दलघमी), बनचिंचोली (९.८० दलघमी), धारापूर ता. हिमायतनगर (९ दलघमी) तर किनवट तालुक्यातील मारेगाव (९.६९ दलघमी), किनवट (१०.५७ दलघमी) आणि माहूर तालुक्यातील धानोडा (१० दलघमी) या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा यशस्वीमराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागील सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या मागणीला गती मिळाली. त्यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून आज प्रत्यक्षात मराठवाड्याच्या हक्काचे ६४ टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAshok Chavanअशोक चव्हाणJayant Patilजयंत पाटीलWaterपाणी