शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

मराठवाड्याला मिळाले हक्काचे ६४ टीएमसी पाणी; नांदेडचे ४० नवे सिंचन प्रकल्पही मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 21:13 IST

मराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागील सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला.

नांदेड -  राज्याच्या हक्काचे तेलंगणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी राज्याच्या व मराठवाड्याच्या हितासाठी पैनगंगेमध्ये उपलब्ध करुन द्यावे, या अनुषंगाने जिल्हयाचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण (Ashok Chavhan) यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.  जलसंपदा विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार १९.२९ टीएमसी पाणी मध्य गोदावरीमध्ये तर ४४.५४ टीएमसी पाणी पैनगंगेमध्ये असे एकूण ६४ टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी उपलब्ध होणार आहे( Marathwada gets 64 TMC water ) . त्यातूनच नांदेड जिल्ह्यातील ४० नवीन प्रकल्प व पैनगंगेवरील सात उच्च पातळी बंधारे मार्गी लागणार आहेत.

मराठवाड्याला हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळाले पाहिजे. यासाठी मागील सात वर्षपासून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या संदर्भात २६ जून २०२१ रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेवून मराठवाड्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सिंचन प्रश्नाबाबत, भविष्यात हाती घ्यावयाच्या सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सदर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होेते. त्यातूनच राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयामुळे मराठवाड्याला ६४ टीएमसी हक्काचे पाणी उपलब्ध होत आहे.  

४० योजनांसाठी १३५.८० दलघमी पाणीगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने स्थानिक स्तरीय २६ योजना व राज्यस्तरीय १४ योजना अशा एकूण ४० योजनांसाठी १३५.८० दलघमी पाणी वापर प्रस्तावित केलेला आहे. या पाणी उपलब्धतेमुळे नांदेड जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भोकर, लोहा, कंधार, मुदखेड, अर्धापूर, नांदेड, देगलूर या तालक्यामध्ये स्थानिक स्तरीय २६ प्रकल्प  हाती घेतले जाणार आहेत. या प्रकल्पांना या पाण्यातून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रस्तावित केलेल्या राज्यस्तरीय १४ योजनांमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, देगलूर, लोहा आणि कंधार या तालुक्यांचा समावेश आहे.

नांदेडसह हिंगोली, यवतमाळलाही फायदापैनगंगा नदीमध्ये उपलब्ध झालेल्या ४४.५४ टीएमसी पाण्यामधून उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या खाली निम्न पैनगंगा प्रकल्पापर्यंत ७ नवीन उच्च पातळी बंधाऱ्यांसोबतच उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाची तूट देखील भरुन निघेल. त्याचा फायदा हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्याला होईल. नवीन सात उच्च पातळी बंधाऱ्यांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिलेले आहेत. यामध्ये हदगाव तालुक्यातील पांगरी साप्दी (९.८० दलघमी), गोजेगाव (१३ दलघमी), बनचिंचोली (९.८० दलघमी), धारापूर ता. हिमायतनगर (९ दलघमी) तर किनवट तालुक्यातील मारेगाव (९.६९ दलघमी), किनवट (१०.५७ दलघमी) आणि माहूर तालुक्यातील धानोडा (१० दलघमी) या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा यशस्वीमराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मागील सात वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर या मागणीला गती मिळाली. त्यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून आज प्रत्यक्षात मराठवाड्याच्या हक्काचे ६४ टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAshok Chavanअशोक चव्हाणJayant Patilजयंत पाटीलWaterपाणी