शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

सावळीची पाणीयोजना अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:56 AM

तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़

ठळक मुद्दे१ कोटी ६२ लाखांची योजना, सप्टेंबरअखेर होणार पाणीपुरवठा

राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : तालुक्यापासून तीन कि़मी़ अंतरावर असलेल्या सावळीत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले. गोदावरी नदी पात्रातून मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले आहे़ केंद्र सरकारने सावळीच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०१५ मध्ये पावणेदोन कोटी खर्चाला मान्यता दिली होती़ दरम्यान सिद्धेश्वर देवस्थानच्या पंचक्रोशीत वसलेल्या सावळी गावाची तहान सप्टेंबर अखेर भागणार आहे़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर काम सुरू आहे़दुष्काळजन्य परिस्थितीत येथे टँकरनेही पाणीपुरवठा करण्याची वेळ येत होती़ गावच्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पाणीपुरवठा होत होता़ गावाची कायम टंचाई दूर करण्यासाठी गाव पातळीवर पाणीपुरवठा समिती करण्यात आली़ गावकऱ्यांनी नागनाथ पाटील नागराळे यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड केली़ सन २०१५ च्या काळात तत्कालीन सरपंच सविता पाटील यांच्या उपस्थितीत ठराव घेऊन नवीन अद्ययावत पाणीपुरवठा योजनेसाठी प्रयत्न सुरू झाले़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सर्व अंदाजपत्रक तयार होऊन गोदावरी पात्रातून पाणीपुरवठ्यासाठी सर्वेक्षण झाले़सात किलोमीटर मुख्य पाईपलाईनसावळी गावासाठी गुजरी स्थित गोदावरी नदी पात्रातून सात किलोमीटर मुख्य पाईपलाईन टाकण्यात येत आहे़ गावात एक लाख ७५ हजार लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले़ गोदा पात्रात भूमिगत विहीर खोदण्यात आली असून मोठ्या प्रमाणात पाणी लागले आहे़ १०० टक्के अनुदान असलेल्या या योजनेतून गावात लहान पाईपलाईन करण्यात येणार आहे़ सध्या शेतीची कामे नसल्यामुळे मुख्य मोठी पाईपलाईनचे काम गुजरी ते सावळी करण्यात येत आहे़ इलेक्ट्रिक मोटार, पंप हाऊस, वॉचमन, विद्युत रोहित्र आदींचे या योजनेत प्रावधान आहे़ जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याच्या देखरेखखाली काम जोरात सुरू आहेग़्रामपंचायत व पाणीपुरवठा समितीच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरपंच सुनीता आरसे यांच्या काळात केंद्राकडून प्रशासकीय मान्यता मिळाली व अनुदान मंजूर झाले़ गाव पातळीवरची मूलभूत पाणीपुरवठा समस्या असल्याने गावकºयांनी अंतर्गत राजकारण बाजूला ठेवून योजनेसाठी प्रयत्न चालवले़ केंद्र सरकारकडून प्रभावी पाणीपुरवठा योजना मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ होय़केंद्राच्या प्रभावी योजनेमुळे पाणीटंचाई संपुष्टात येईल -नागनाथ पाटील सावळीकर, सरपंच, सावळी़सावळी ग्रा.पं.नेपाणीपुरवठा समिती स्थापन करून ही मुलभूत समस्या दूर केली- आबाराव संगनोड, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान समिती, सावळी़योजनेसाठी सतत पाठपुरावा केला़ योजनेची व्याप्ती मोठी असल्याने गावात पाणी समस्या राहणार नाही -गंगाधर आरसे, माजी सरपंचकामाची प्रगती पाहता दिवाळीपूर्वी गावकºयांना पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे़ केंद्राकडे राज्य शासनाच्या माध्यमातून केलेले प्रयत्न कामी आले - शेख जानेमियाँ, माजी उपसरपंच, सावळी़

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईfundsनिधी