शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

तेलाच्या मागणीत वाढ, पेरणी क्षेत्रात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला ...

नांदेड जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र साडेसात लाख हेक्टर असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या निम्म्याहून अधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. परंतु, यंदा बोगस बियाणे आणि अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनसह इतरही तेलपिके घेतली जातात. परंतु, ती अत्यल्प प्रमाणात आहे. यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात काही पिके घेतली जातात जसे भुईमुग,करडी. यंदाच्या खरिपात ४५५ हेक्टर तीळाचा पेरा झाला होता. त्याचबरोबर इतर गळीत धान्य ७४ हेक्टरवर होते.

रब्बीमध्ये भुईमुगाची पेरणी सुरू असून जवळपास १५ ते १८ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर करडीचा २ हजार ६३६ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्याचबरोबर जवस ९ हेक्टर आणि इतर गळीत धान्य ९७ हेक्टवर पेरण्यात आले आहे.

चौकट.......

करडी, सूर्यफूल हद्दपार होण्याच्या मार्गावर

जिल्ह्यात सोयाबीनसह करडी, मोहरी, तीळ, भूईमुग, सूर्यफूल या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या पेऱ्यात विक्रमी वाढ हाेत आहे. यंदा सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९ हजार असताना ३ लाख ८१ हजार ३८३ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. त्यापाठोपाठ रब्बीमध्ये भुईमुगाचा जवळपास १८ हजार हेक्टरवर पेरा होईल. खरिपात भुईमुगाचे पीक कोणीही शेतकऱ्यांनी घेतले नाही. रब्बीमध्ये जवस, तीळ, करडी या पिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये करडी जवळपास २६३६ हेक्टरवर पेरण्यात आली आहे.

कोट.....

जिल्ह्यात तेल पीक जास्त प्रमाणात घेतल्या जात नाही. परंतु, सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जात असून त्यात लक्षणीय वाढ होत आहे. यंदा खरिपात ३ लाख ८० हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा झाला आहे. त्यानंतर तेलपिकामध्ये भुईमुगाचा पेरा असतो तो पंधरा ते वीस हजारांच्या घरात असतो. काही करडी, जवस, सूर्यफूल हे नगण्य असून १०० ते २०० हेक्टरमध्ये असते.

-रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

नांदेड जिल्ह्यात केवळ सोयाबीनच्या माध्यमातून तेल उत्पादित करणाऱ्या कंपन्या आहेत. परंतु, इतर तेल पीक घेऊनही त्यास योग्य बाजारपेठ मिळणार नाही. त्या भितीने आम्ही इतर पिके घेत नाही. मागील अनेक वर्षापासून सोयाबीनचे पीक घेतो. यंदा सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्याने अडचणींचा सामना करावा लागला. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीने काहीच हाती आले नाही.

- त्र्यंबक सूर्यवंशी, शेतकरी