शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

पैनगंगेचे पाणी इतरत्र वळविल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 01:27 IST

राज्याच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ही संघर्षयात्रा सुरु आहे. यात्रेच्या धास्तीनेच राज्य शासनाने १८५ तालुके दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केले आहेत. जनहितासाठीचा सरकारवरील रेटा यापुढील कळातही कायम ठेवू, असा शब्द देतानाच मराठवाड्याच्या हक्काचे अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. तसा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : राज्याच्या हितासाठी व जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाची ही संघर्षयात्रा सुरु आहे. यात्रेच्या धास्तीनेच राज्य शासनाने १८५ तालुके दुष्काळसदृश्य म्हणून जाहीर केले आहेत. जनहितासाठीचा सरकारवरील रेटा यापुढील कळातही कायम ठेवू, असा शब्द देतानाच मराठवाड्याच्या हक्काचे अप्पर पैनगंगेचे पाणी इतरत्र वळविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. तसा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरुन संघर्ष करु, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिला.हदगाव येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, जि. प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, नगराध्यक्ष ज्योतीबाई राठोड, उपनगराध्यक्ष सुनील सोनवणे, माजी नगराध्यक्ष अमित अडसूळ, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप शिंदे, तालुका अध्यक्ष बाबूराव पाथरडकर, अनिल पाटील बाभळीकर आदींची उपस्थिती होती.आपलेच पैसे काढण्यासाठी या सरकारने बँकेसमोर सर्वसामान्यांना उभे केले. दुसरीकडे इंधन दरवाढ करुन जनतेच्या खिशाला कात्री लावली. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारचा कारभारही नियोजनशून्य असल्याचे सांगत कर्जमाफीची सरकारने केवळ घोषणा केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या ओंजळी रिकाम्याच राहिल्या आहेत. या सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाºया लोकसभा, विधानसभेची संधी चुकवू नका, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वसामान्यांच्या विकासाचा शब्द देवून हे सरकार सत्तेत आले. मात्र सत्ता हाती आल्यानंतर जनतेला विसरले. आज देशाचे संविधान बदलण्याची भाषा केली जात आहे.दुसरीकडे देशातील सर्वोच्च यंत्रणा या सरकारच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे आपली स्वायतत्ता गमावत असल्याचे सांगत चार वर्षांत सरकारने देशातील लोकशाहीसमोरच आव्हान उभे केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.आता रबीचा हंगाम सुरु आहे. त्यासाठी २४ तास विजेची आवश्यकता असते. परंतु, ग्रामीण भागात १५-१८ तास भारनियमन केले जात आहे. दुसरीकडे केवळ डिझेल उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणच्या डीपी बंद आहेत. या सर्व परिस्थितीमुळे शेतकºयांना पिकांना पाणीही देता येत नाही. अशा या शेतकरीविरोधी सरकारला पुन्हा थारा देवू नका, असे सांगत जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. राफेल घोटाळ्यामुळे हे सरकार किती भ्रष्ट आहे, हेही जनतेसमोर आल्याचे सांगत यापुढील काळात भावनेच्या आहारी न जाता मतदान करा. सर्वसामान्यांच्या हिताची काळजी घेणाºया काँग्रेसच्या पाठीशी रहा, असे आवाहनही त्यांनी केले.प्रारंभी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाषण झाले. सेना-भाजप सरकारच्या कारभाराला शेतक-यांसह राज्यातील सर्वच घटक वैतागल्याचे सांगत मागील चार वर्षांतील या सरकारच्या कार्यकाळात तब्बल १६०० शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी युती शासन केवळ भाषणबाजी करण्यामध्ये गुंग असल्याचे सांगत राज्याचा कारभार हाकण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे ते म्हणाले. हदगाव येथे झालेल्या या सभेला जवळपास दहा हजारपेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :NandedनांदेडCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राAshok Chavanअशोक चव्हाण