शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

जोमात आलेले सोयाबीन नासल्याने वर्ष काढावे कसे? शेतकरी चिंतेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:15 IST

शेतकरी म्हणतात...यंदा दिवाळी साजरी झालीच नाही !

ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील व्यथा  कापसाचीही झाली माती

- सुनील चौरे 

हदगाव (जि. नांदेड) : मनाठा-वरवंट शिवारातील शेतकऱ्यांची यंदा दिवाळी साजरी झालीच नाही. परतीच्या पावसाने झोडपून काढल्यामुळे उभे सोयाबीन भिजून कोंब फुटले. कापून ठेवलेले सोयाबीन जमा करण्यापूर्वीच शेतामध्ये तळे साचले. कुठे अर्धे सोयाबीन जमा झाले तर कुठे शेतामध्येच विखुरलेले राहिले. यामुळे शेतकऱ्यांची घाळण झाली. काढलेल्या सोयाबीनला दोन हजार रुपये बाजारभाव मिळाला. यात वर्ष काढावे कसे अन् घर चालवावे कसे? या चिंतेत शेतकरी आहेत.

वरवंट शिवारातील राजेश्वर वाठोरे, मधुकर वाठोरे यांचे सोयाबीन संपूर्ण शेतामध्ये विखुरलेले होते. ढीग जमा केला तर मळणीयंत्र चिखलामध्ये जात नाही. प्रयत्न करुन सोयाबीन काढले तर बाजारात सोयाबीन ओले व काळे पडल्याने भाव मिळत नाही, असे त्यांंनी सांगितले. मनाठा शिवारातील धोंडबा बोईनवाड, शिवाजी बोईनवाड यांचेही प्रचंड नुकसान झाले. दोन एकर घरची जमीन व दोन एकर खंडण केली. या दोन्ही शेतातील सोयाबीन पावसाने चिंब भिजले.  कसेतरी सोयाबीन काढले. सुंदराबाई  बोईनवाड म्हणाल्या, आमची दिवाळी यंदा झालीच नाही. हातात एक पैसा नाही.  सोयाबीन एकत्र जमविणे, ढीग झाकून ठेवणे, दररोज उघडणे यामध्ये दिवाळी गेली. सोयाबीन ७० टक्के नासले आहे, असेही त्या म्हणाल्या.

कापसाचे पीकही नाजूक असते. त्याला कमी वा जादा पाऊस जमत नाही.  शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने फुटलेल्या बांधामध्ये बांध फुटत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत. आपबिती सांगताना त्यांचा ऊर दाटून येत होता. वर्षाचे गणित बिघडले आहे. शेतकऱ्यांनी जवळचे पैसे शेतात टाकले. सुगी आलेली असताना परतीच्या पावसाने तोंडचा घास हिरावून घेतला. शासनाने  आर्थिक मदत देण्याची गरज आहे, असे शेतकरी बोलून दाखवित आहेत.   तलाठ्यांनी स्पॉट पंचनामे केले. काही शेतावर ते गेले, मात्र शेजारच्या शेतात जाण्याचे टाळल्याने नाराजी वाढली आहे.

माझ्या शेतात तीन बॅग सोयाबीन होते. ढीग मारुन ठेवला मात्र खालून वरुन पाणीच पाणी. शेतामध्ये चिखल असल्यामुळे मळणीयंत्र शेतात येत नाही. पाऊस थांबत नाही. सोयाबीन काढले. सोयाबीन भिजल्यामुळे आर्द्रता व काळे पडल्यामुळे प्रतिक्विंटल दोन हजार भाव लागला. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलो.-धोंडबा बोईनवाड

एक एकर वावर. यामध्ये एक बॅग सोयाबीन. शेजारी दोन एकर खंडण केले. यामध्ये दोन बॅग सोयाबीन होते. दोन्ही शेतात आताही चिखलच आहे. घरच्या शेतातील ७० टक्के सोयाबीन नासले तर केलेल्या शिवारातील ५० टक्के खराब झाले. पाऊस उघडला नाही तर आणखी १५ दिवस मळणीयंत्र शेतात येत नाही.  पाऊस पडला तर काहीच हाती लागत नाही. खंडण केलेल्या शेतामध्ये तर नुकसानच नुकसान झाले.-सुंदराबाई बोईनवाड

पावसामुळे खूप घाळण झाली.  पीकपाणी बरे होते. तोंडाला आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला. दिवाळी आमची शेतातच झाली. हातात रुपयाही नाही. -अनिल सोनाळे, मनाठा

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसNandedनांदेड