शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान प्रणालीतूनच नवसमाजाची निर्मिती - उपराकार लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST

नांदेड : भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, विज्ञानवाद आणि समाजवाद यावर आधारलेल्या समताधिष्ठित तत्वज्ञानातूनच भारतीय संविधानाची निर्मिती ...

नांदेड : भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, विज्ञानवाद आणि समाजवाद यावर आधारलेल्या समताधिष्ठित तत्वज्ञानातूनच भारतीय संविधानाची निर्मिती झाली. ज्या संस्कृतीने जन्मतःच माणसांची वर्ण, अवर्ण, अस्पृश्य, आदिवासी, गुन्हेगारी जमात अशी वर्गवारी केली; अशा संस्कृतीला मूठमाती देऊनच भारतीय संविधान प्रणालीतूनच नवसमाजाची निर्मिती होऊ शकते, असे प्रतिपादन उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित सातदिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी पहिले उद्घाटकीय पुष्प गुंफताना ‘बाबासाहेबांचे संविधान राष्ट्र कोणासाठी?’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, डॉ. प्रकाश राठोड, अशोक बुरबुरे, संजय मोखडे, भय्यासाहेब गोडबोले, सज्जन बरडे, प्रशांत गवळे आदी उपस्थित होते.

माने म्हणाले, या देशातील वर्णवादी धर्मव्यवस्था ग्रंथप्रामाण्यवादी आहे. या व्यवस्थेच्या शिक्षणपद्धतीमुळे शिकलेल्यांचे ब्राह्मणीकरण झाले. शुद्रातिशुद्रांसह स्त्रियांनाही व्यक्तिस्वातंत्र्याचा दर्जा, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद, निर्णयक्षमता ही बाबासाहेबांची देण आहे. समताधिष्ठित समाज हे बाबासाहेबांचं स्वप्नं होतं. संविधानद्रोही लोकांच्या हातात आज सत्ता आहे. त्यामुळे संविधानाची तोडमोड सुरू आहे. इथले पिढ्यानपिढ्यांचे हक्कवंचित राज्यकर्ते बनले तरच भारत हे संविधान राष्ट्र बनू शकते. बाबासाहेबांचे संविधान राष्ट्र त्यांच्यासाठीच आहे, असेही ते म्हणाले.

महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर या कार्यक्रमात पिराजी भालेराव, सुनील खांडेकर, श्रीमंत बनसोडे, शिलवंत डोंगरे, महेंद्र मुन्नेश्वर, आवेश वासनिक, चंद्रकांत बोकेफोडे, शैलेश बागुल, विशाल वाळके, उषा नगराळे, सत्यजित साळवे, आदींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महामंडळाचे पदाधिकारी अरविंद निकोसे, डॉ. सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अमृत बनसोड, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे आदींनी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.

चौकट....

मोदींनी देश विकायला काढला!

पंतप्रधान मोदींनी देशातील सर्वच सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण सुरू केले आहे. मोदींनी देशच विकायला काढला आहे. ही संघवादी मानसिकताच आहे. खासगीकरणाच्या माध्यमातून त्यांना देशावर मनुवाद लादायचा आहे, असे लक्ष्मण माने म्हणाले. त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, शेजारी राज्यात कोरोना आढळत नाही, बंगालमध्ये निवडणुका होतात, सभा होतात, शेतकऱ्यांचे आंदोलनही मोठ्या संख्येने सुरू असते. मग कोरोनाची महामारी महाराष्ट्रातच आहे का? असा प्रश्न उपस्थित करून कोरोनाची भीती हे भांडवलदारांचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला.