शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! वाळू माफियाकडून शेतकऱ्याची कोयत्याने गळा चिरून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:55 IST

शेतकऱ्याने पिकांना पाणी दिल्याने शेतातील चिखलमय रस्त्यातून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा होत असल्याने ही हत्या झाल्याची माहिती आहे. 

हदगाव: तालुक्यातील ऊंचाडा गावातील कयादु नदीच्या पात्रानजीक शेती असलेल्या एका शेतकऱ्याची वाळू माफियाने कोयत्याने गळा चिरून निर्घुण हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजे दरम्यान घडली. शिवाजी धोंडबाराव कदम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कदम यांनी पिकांना पाणी दिल्याने शेतातील चिखलमय रस्त्यातून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा होत असल्याने ही हत्या झाल्याची माहिती आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजी धोंडबाराव कदम (ऊमरकर) यांचे कयादु नदीकाठी तीन एकर शेती आहे. यामध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे. नदीला पाणी असल्याने शेतात पाणीपाळी देणे सुरू आहे. मात्र या शेतातून मोठ्याप्रमाणावर अवैध वाहतूक करण्यात येते. पाणी दिल्याने शेत चिखलमय झाल्याने येथून अवैध वाळू वाहतूक करण्यात अडथळा निर्माण झाला आहे. याच्या रागातून आज सकाळी ८:०० वाजता त्र्यंबक प्रभाकर चव्हाण (२८) याने शेतात पाणी का सोडतो असा विचारत कदम यांच्या मानेवर वार केला. कोयत्याचा मार लागताच शिवाजी किंचाळला त्यांचे वडील शेतातच होते. त्यांनी शिवाजीकडे धाव घेताच आरोपी फरार झाला. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने शिवाजी याचा तत्काळ मृत्यू झाला. 

दरम्यान, आरोपी त्र्यंबक चव्हाण यास एका वाळु ट्रक्टरमागे २००रु मिळत असून या भागातील वाळू माफियांना पोलीस व महसुल विभागाचे पाठबळ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी बीट जमादार शाम वडजे यांना निलंबित करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

टॅग्स :NandedनांदेडMurderखूनCrime Newsगुन्हेगारीsandवाळू