शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nanded : भाजीपाला सडतोय शेतातच; आठ दिवसांपासून बाजार समितीचा व्यवहार पूर्णपणे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 15:05 IST

बाजारसमिती परिसरात संचारबंदीने शुकशुकाट

ठळक मुद्देग्रामीण भागात भीतीचे वातावरण: शेतकऱ्यांचा भाजीपाला सडतोय शेतातचशासनाच्या नियोजनाची गरज

नांदेड : जिल्ह्यात जवळपास पंधरा दिवसापासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परिणामी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सर्व व्यवहार 20 मार्च पासून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात शुकशुकाट पसरला आहे. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात 13 मार्च पासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे आणि त्यानंतर शासनाने संचारबंदी लागू केली. जिल्हा सीमा बंद करण्याच्या सूचना केल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेऊन येणाऱ्या दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेता आणि ग्रामीण भागातून भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना काही ठिकाणी पोलिसांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातून शहरात यायला कोणी हिंमत करत नाही. त्यामुळेच भाजीपाला आणि दूध, गहू आदी मालाची आवक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांसह चाकरमान्यांनाही सहन करावा लागत आहे.  बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याने शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला शेतातच सडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचा फटका शहरी भागातील जनतेनेलाही सहन करावा लागत आहे. काही भाजीपाला विक्रेते आपल्याकडे उपलब्ध असलेला भाजीपाला चढ्या भावाने विक्री करत आहेत तसेच पुढे किती दिवस बंद राहील अशी भीती ग्राहकांना घालून जो माल उपलब्ध आहे तो त्यांच्या माथी मारण्याचे काम केले जात आहे. तर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून कोणीही भाजीपाला घेत नसल्याचे कारण देत भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने भाजीपाला घेत आहेत. कोरोना च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा अनेक भाजीपाला विक्रेते, व्यावसायिक घेत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या गावात भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत. त्यांची बैठक घेऊन सदर माल संबंधित बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी

कोरोनाव्हायरस च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या व्यावसायिकांवर शासनाने  कारवाई करावी तसेच शेतमाल उत्पादन करणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी शहरात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी त्याच बरोबर त्यांना पोलीस प्रशासनाकडून कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि ग्रामसेवक, सरपंच यांना सूचना देऊन भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य, मार्गदर्शन करावे आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी डॉ विठ्ठलराव विखे- पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेडFarmerशेतकरीagricultureशेती