शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

महाराष्ट्र जिंकण्याचा काँग्रेसचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:42 IST

स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अनावरण झाले. सामाजिक समतेचा, एकतेचा संदेश देणारा हा क्षण आहे.

ठळक मुद्देअशोक गहलोत यांचा नागरी सत्कारआगामी निवडणुका एकजुटीने लढणार

नांदेड : स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या फुले दाम्पत्यांच्या पुतळ्याचे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी अनावरण झाले. सामाजिक समतेचा, एकतेचा संदेश देणारा हा क्षण आहे. अशा क्षणी सर्व सामान्यांचे, सर्व घटकांचे हित जपणाºया काँग्रेसचे सरकार आगामी निवडणुकीत राज्यात आणि देशात आणण्याचा निर्धार काँग्रेस पदाधिकाºयांनी व्यक्त केला. निमित्त होते राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नागरी सत्काराचे.शहरातील मोंढा मैदानावर जिल्हा काँग्रेसच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेस कार्यकर्त्यांची अलोट गर्दी होती. मंचावर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, खा. राजीव सातव, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी संपतकुमार, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण, बसवराज पाटील, आ. अब्दुल सत्तार, आ. अमर राजूरकर, आ. वसंतराव चव्हाण, जि.प. अध्यक्षा शांताबाई जवळगावकर, महापौर शिलाताई भवरे यांच्यासह मराठवाड्याच्या विविध भागातून आलेल्या पदाधिकाºयांची उपस्थिती होती. नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकात भाजपाचा सपाटून पराभव झाला. त्याचीच पुनरावृत्ती आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकातही दिसून येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त झाला.प्रारंभी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे भाषण झाले. भाजपा सरकार देशाला मागे घेवून जात असल्याचा आरोप करीत या सरकारचा प्रवास मनूस्मृतीच्या दिशेने सुरू असून देशात धर्मांधतेचे वातावरण निर्माण करणाºया भाजपाला सर्वांनी एकत्रित येऊन धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी नांदेडमधील ही नागरी सत्काराची सभा उद्याच्या परिवर्तनाची नांदी असल्याचे सांगत हा सत्कार नव्हे तर संकल्प दिन आहे. पाच वर्षात विषमतेचे राजकारण करणाºया भाजपाला धडा शिकवून देशाचे वैभव पुन्हा आणण्यासाठी राहूल गांधींना पंतप्रधानपदी बसवू या, असे आवाहन केले. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमुळे महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेसमय झाल्याचे सांगत तीन मोठ्या राज्यात काँग्रेसने विजयी मिळविला आहे. येणाºया निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातही परिवर्तन झालेले दिसेल, असा विश्वास व्यक्त केला. खा. राजीव सातव यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मागील दीड वर्षापासून कर्जमाफीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांचा अभ्यासच सुरू असल्याचे सांगत काँग्रेसचे मुख्यमंत्री गहलोत यांनी पहिल्याच दिवशी कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ पैकी ४० जागा जिंकू, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष पांडागळे यांनी तर आभार आ. अमरनाथ राजूरकर यांनी मानले. सभेला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.फायनलही आम्हीच जिंकूकाँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेने महाराष्ट्र ढवळून निघाला. महाराष्ट्रातील जनतेला बदल हवा आहे, हे स्पष्ट झाले. नुकत्याच सेमी फायनल असलेल्या विधानसभा निवडणुकात तीन राज्यात काँग्रेस जिंकली. या विजयामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे. येणाºया निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसची विजयी होईल. लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्धची फायनलही आम्हीच जिंकू, असा विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. भाजपा सरकारचे शेवटचे शंभर दिवस उरले आहेत. आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बॅटींगची वेळ आहे. तुफान फटकेबाजी करा, असे आवाहनही त्यांनी केले.शेतक-यांविषयी काँग्रेसलाच आस्थाकाळे धन परत आणणार होते, २ कोटी लोकांना रोजगार होते. काय झाले त्याचे? भाजप सरकारची साडेचार वर्षे केवळ गप्पा मारण्यात गेली. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतक-यांची दूर्दशा झाली आहे. ती थांबविण्याचे काम काँग्रेसचे सरकार प्राधान्याने करेल. त्यामुळे राहूल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवून महाराष्ट्रासह देशात सत्तांतर घडवा, असे आवाहन राजस्थानचे नवनियुक्त मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले. राहूल गांधी बोलतात ते करुन दाखवितात. राजस्थानमध्ये सत्ता आल्यानंतर पहिला निर्णय शेतकºयांच्या कर्जमाफीचा घेतला. काँग्रेस सरकारच हे करु शकते. त्यामुळे एकजुटीने निवडणुका लढवून भाजपाला धडा शिकवू, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.

टॅग्स :NandedनांदेडAshok Gahlotअशोक गहलोतAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक