शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

नांदेड जिल्ह्यात अवघा ९.३५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:05 AM

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे.

नांदेड : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा आहे. त्यातच वाढत्या तापमानामुळे साठ्यात वेगाने घट होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा १०६ प्रकल्पांत मिळून केवळ ९.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.नांदेड जिल्ह्यात १०६ प्रकल्प आहेत. यात मानार आणि विष्णूपुरी या प्रकल्पांकडे मोेठे प्रकल्प म्हणून पाहिले जाते. मानार प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता १४६.९२ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात २१.८७ दलघमी म्हणजेच १५.८२ टक्के पाणी उपलब्ध आहे. विष्णूपुरी प्रकल्पाची पूर्ण जलक्षमता ८३.५५ दलघमी आहे. या प्रकल्पात सध्या केवळ ८.८३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून या पाण्याची टक्केवारी १०.९३ इतकी आहे. जिल्ह्यात ९ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता १७९.९८ दलघमी आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पांत ८.७३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.२८ इतकी आहे. तर जिल्ह्यातील ३ उच्च पातळी बंधाऱ्यांची पूर्ण जलक्षमता १२१.७० दलघमी आहे. सद्य:स्थितीत या तीन बंधाऱ्यांत ७.६३ दलघमी उपयुक्त पाणी असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ६.३९ इतकी आहे. जिल्ह्यात ८८ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पूर्ण जलक्षमता २१६.४५ दलघमी इतकी आहे. सद्य:स्थितीत या ८८ प्रकल्पात केवळ १६.०८ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून ही टक्केवारी ८.४१ एवढी आहे. तर जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या चारही बंधा-यात सध्या ठणठणाट आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईvishnupuri damविष्णुपुरी धरणDamधरण