शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्या शाैर्याच्या स्टाेरीज ऐकायला तू हवा हाेतास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST

नागपूर : १९९९ च्या मे ते जुलै महिन्यात कुणाला पिता, पुत्र, भाऊ, पती, मित्र व सहकाऱ्यांना साश्रूनयनांनी अलविदा म्हणाव ...

नागपूर : १९९९ च्या मे ते जुलै महिन्यात कुणाला पिता, पुत्र, भाऊ, पती, मित्र व सहकाऱ्यांना साश्रूनयनांनी अलविदा म्हणाव लागल हाेतं. कारगिल युद्धात २० ते ३५ वर्षांच्या ५२७ वीरपुत्रांनी भारतमातेसाठी प्राणार्पण केले हाेते. त्यातीलच एक शाैर्यपूर्ण गाथा आहे कॅप्टन विक्रम बत्रा यांची.

पाकिस्तानी सैन्यात ‘शेर शाहा’ या टाेपण नावाने ओळख हाेती. कॅप्टन विक्रम व कॅप्टन संजीव जमवाल यांच्या नेतृत्वात कारगिलच्या पाॅईंट ५१४० वर विजय मिळविला हाेता. १७,००० फूट उंचीवर केलेल्या या ऑपरेशनमधे एकही जीवहानी न होता पाकड्यांना हाकलून येथे १३ जम्मू काश्मीर लाईट इन्फन्ट्रीच्या सैनिकांनी कब्जा केला व तिरंगा ध्वज फडकाविला. त्यांची व्हिक्ट्री साईन पाहून हर्षाेल्हासित झालेल्या सेनाध्यक्ष जनरल व्ही. मलिकनी अभिनंदन करून तुला काय हव, असे विचारले. विक्रम बत्रा उत्तरले, ‘सर ये दिल मांगे माेअर...’ या पाॅईंटवर विजय मिळविल्यानंतर २६ जूनपर्यंत तेथे मुक्काम केला. त्यांची कंपनी पलटण मुख्यालयात परतल्यानंतर पुन्हा पाक सैनिकांनी कब्जा केलेल्या ‘पाॅईंट ४८७५’ च्या माेहिमेसाठी सज्ज झाली. ६ जुलैपर्यंत या पाॅईंटवर विजय मिळविता आला नव्हता, त्यामुळे कॅप्टन बत्रा यांच्या कंपनीला तेथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅप्टन बत्रा यांची कंपनी तेथे पाेहचताच तेथील भारतीय सैनिकांमध्ये स्फुरण निर्माण झाले. पाकिस्तानी सैनिकांकडेही ही बातमी पाेहचली. ‘शेर शाहा, उपर आ गये पर वापस नही जाने देंगे...’, असा दंभ त्यांनी भरला. विक्रम यांनीही ‘उपर हम नही, तुम्हे भेजेंगे’, असे उत्तर दिले. त्यानुसार ७ जुलैच्या रात्री त्यांनी लेजवर हल्ल्याची तयारी केली. थकवा व ताप असतानाही. बर्फवृष्टीमुळे हाड गाेठविणाऱ्या थंडीत ही कंपनी लढण्यास सज्ज झाली.

कॅप्टन विक्रम यांनी या पाॅईंटवर माेठ्या शाैर्याने शत्रूला नामाेहरम करून पराजित केले. त्यावेळचा प्रत्यक्ष घटनाक्रम शरीरात कंपने निर्माण करणाराच आहे. यावेळी शत्रूच्या गाेळ्यांनी ते जखमी झाले हाेते. या दरम्यान स्फाेटात पाय तुटलेल्या सहकाऱ्याला वाचविण्यास ते त्याच्या जवळ गेले. सुभेदारांनी त्यांना राेखण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ‘तुम्ही मुलाबाळाचे माणूस आहात, तुम्हीच मागे हटा’, असा आदेश देत समाेर जाऊन जखमी सहकाऱ्याला खडकामागे आणले. मात्र यावेळीच लपून असलेल्या शत्रूने त्यांच्या छातीवर गाेळ्या झाडल्या. या वीरपुत्राने त्या जागी आपला देह ठेवला. ‘गड आला पण सिंह गेला’, याप्रमाणे पाॅईंटवर विजय मिळविला पण सिंह धारातीर्थी पडला. कॅप्टन विक्रम यांना मरणाेपरांत परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कॅप्टन विक्रम हे बालमैत्रिण डिम्पलशी लग्न करणार हाेते पण त्याआधीच देवाकडे जावे लागले. त्यांचे स्मरण करताना ही बालमैत्रिण लिहिते, ‘तुझ्या आठवणीतून वेगळे हाेणारा एकही दिवस जात नाही. लाेक तुझ्याबद्दल विचारतात तेव्हा आजही गर्व वाटतो व उर भरून येताे. तू माझ्या हृदयात, आयुष्यात सदैव राहशील व आपण पुन्हा भेटू. मात्र तुझ्याच शाैर्यगाथा ऐकायला तू येथे हवा हाेतास विक्रम...’