शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी : रघुनाथदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:28 IST

१९५५ साली तयार झालेला वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी असून तो बदलण्यात यावा. तसेच राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. याविरोधात ‘लढा शेतकरी हक्काचा’ व महाराष्ट्र सुकाणू समितीच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पायी चालून विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे२४ ला विधानसभेवर मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९५५ साली तयार झालेला वन्यजीव संरक्षण कायदा शेतकरीविरोधी असून तो बदलण्यात यावा. तसेच राज्य शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. याविरोधात ‘लढा शेतकरी हक्काचा’ व महाराष्ट्र सुकाणू समितीच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान पायी चालून विधानसभेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव तालुक्यात टी १ अवनी नामक वाघिणीने धुमाकूळ घालत १३ गरीब आदिवासींचे बळी घेतले. तेथील शेतकरी भीतीच्या सावटाखाली वावरत असल्याने त्या वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र वन्यजीवप्रेमी नावाची जमात त्यावर वादंग माजवत असून, १३ गरीब आदिवासींचे बळी गेले तेव्हा ते कुठे होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वन्यजीवांचा लळा असणाऱ्यांनी स्वत: गावांमध्ये जाऊन अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. राज्यात शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेतले जाते. एका वाघाने शेतकऱ्याला ठार केले होते. त्यावेळी छत्रपती शाहू महाराजांनी मोजक्या शिकाऱ्यांना सोबत घेऊन त्या वाघिणीचा बंदोबस्त करण्यासाठी आठ दिवस जंगलात तळ ठोकला होता. याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. वन्यजीव संरक्षण कायदा कुचकामी ठरला असून तो कायदा रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार, रुद्रा कुचनकार, अरुण वनकर, दिनकर दाभाडे उपस्थित होते.वीज कनेक्शन खंडित करण्याचा आदेश मागेकाही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थकीत वीज बिलामुळे कृषिपंपधारकांचे कनेक्शन खंडित करण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्य शासनाने २० हजार कोटी रुपये दिले; शिवाय न्यायालयानेही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करता येणार नाही, असा निर्णय दिला. ऊर्जामंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या बाबी लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी आपला आदेश मागे घेतला. मात्र शेतकऱ्यांचे सरसकट वीज बिल माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :wildlifeवन्यजीवFarmerशेतकरी