शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

सुभाषचंद्र बोस यांना अमेरिका, युरोपमध्ये मान्यता का नाही ? अनुज धर यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 22:34 IST

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्दे‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील वातावरण हे पाश्चिमात्य धार्जिणे ठेवण्यावरच भर देण्यात आला. अमेरिका, युरोपमध्ये एखाद्या गोष्टीला मान्यता मिळत असेल तरच त्यासाठी पुढाकार घेण्याकडे राजकारण्यांचा कल होता. यातूनच देशातील अनेक स्वातंत्र्यसेनानींच्या त्यागाकडे दुर्लक्ष करण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर देशासाठी प्रचंड त्याग केला. परंतु त्यांनादेखील युरोप व अमेरिकेत मान्यता का मिळू शकली नाही, असा प्रश्न प्रसिद्ध लेखक अनुज धर यांनी उपस्थित केला. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.आजच्या काळात जर तरुण पिढीपर्यंत स्वातंत्र्यसेनानींचे योगदान पोहोचवायचे असेल तर सिनेमा हे सर्वोत्तम माध्यम आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी प्रचंड छळ सहन केला. मात्र त्यांचादेखील जाहीरपणे अपमान होतो. कुठल्याही स्वातंत्र्यसेनानीचा अशाप्रकारे अपमान करणे योग्य नाही.योगी आदित्यनाथांना नेताजींमध्ये रस नाहीअखिलेश यादव उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ‘गुमनामी बाबा’ यांच्याशी संबंधित साहित्य व जीवनावर प्रकाश टाकणारे संग्रहालय बनविण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बहुतेक नेताजींच्या जीवनामध्ये रस नाही. म्हणूनच त्यांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावले उचललेली नाही, असे अनुज धर यांनी सांगितले.‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी असल्याचे पुरावेदरम्यान, अनुज धर यांनी गुरुवारी ‘मंथन’तर्फे आयोजित ‘इन्साईड सुभाष बोस मिस्ट्री’ या विषयावर व्याख्यान दिले. सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैपेईमध्ये विमान दुर्घटनेत झाला नव्हता. तर त्यानंतरही ते ‘गुमनामी बाबा’ बनून राहिले. ‘गुमनामी बाबा’ यांच्या निवासस्थानी मिळालेले पुरावे हेच स्पष्ट करणारे आहेत, असा दावा अनुज धर यांनी केला. सुभाषचंद्र बोस यांचे सत्य समोर यावे ही देशवासीयांची इच्छा होती. मात्र शासनकर्त्यांनी कधीच ही बाब मनावर घेतली नाही. पं.जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात नेताजींच्या कुटुंबीयांवर २० वर्षे पाळत ठेवण्यात आली होती व त्याचे पुरावेदेखील उपलब्ध आहेत. सरकारलादेखील बोस जिवंत असल्याची माहिती होती.‘गुमनामी बाबा’ हे अयोध्या, नीमसर, फैजाबाद, लखनौ व बस्ती येथे राहिले. ते भगवानजी म्हणून ओळखले जायचे व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करणारे पत्र लिहीले होते. जर सरकारला नेताजींबाबत जाणून घेण्याची इच्छा होती तर ‘डीएनए’ चाचणीच्या माध्यमातूनदेखील ते शक्य होते. ‘गुमनामी बाबा’ व सुभाषचंद्र बोस यांचे हस्ताक्षर एकच असल्याचा निष्कर्ष ‘फॉरेन्सिक’ तज्ज्ञांनी दिला होता. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी माहिती अनुज धर यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन अंकिता देशकर यांनी केले तर रसिका जोशी यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस