शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण कधी होणार ? आठवडा उलटूनही सर्वेक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 23:10 IST

जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ९ हजार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.

ठळक मुद्दे९११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात मागच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सावनेर, कळमेश्वर आदी तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास ९ हजार ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. परंतु या अतिवृष्टीला आठवडा लोटूनही नुकसानीचे सर्वेक्षण मात्र झालेले नाही. त्यामुळे सर्वेक्षण कधी होणार आणि नुकसाान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२१ व २२ जुलै रोजी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे २२ जुलैला जिल्ह्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस झाला. कामठी, सावनेर, कळमेश्वर, रामटेक व हिंगणा तालुक्यातील २१९ गाव बाधित झाले. पावसामुळे ९ हजार ११५.१२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले तर जवळपास ८ हजारावर शेतकरी बाधित झाले. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सर्वाधिक ५ हजार हेक्टरमधील कापूस पिकांचे नुकसान झाले तर त्या खालोखाल तूर, सोयाबीन, धान, मका, संत्रा, मोसंबी व आदी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार अद्यापही जिल्ह्याच्या अतिवृष्टी झालेल्या तालुक्यातील गावांमध्ये कृषी व महसूल विभागातील कर्मचारी नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण करीत आहेत. परिणामी प्रशासनाकडून अद्यापही त्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवालच तयार झाला नाही. त्यामुळे प्रशासन किती गांभीर्याने हे सर्वेक्षण करत आहे, हे दिसून येते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस