शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाची दुरुस्ती कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील रेवराल-राजाेली-काेदामेंढी हा मार्ग २५ गावांना जाेडला आहे. दुरुस्तीअभावी या मार्गाची दैनावस्था झाली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील रेवराल-राजाेली-काेदामेंढी हा मार्ग २५ गावांना जाेडला आहे. दुरुस्तीअभावी या मार्गाची दैनावस्था झाली असून, खड्ड्यांमुळे त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. शिवाय, अपघाताचा आलेखही चढता आहे. राेडवरील खड्डे माेठ्या अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता बळावल्याने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.

धर्मापुरी, तांडा, मोरगाव, रेवराल, खंडाळा, पिपरी, आष्टी, नवरगाव, चारभा, राजोली, नांदगाव, कोदामेंढी, सुंदरगाव, मांगली (तेली), आजनगाव, धामणगाव, निमखेडा, अरोली यासह एकूण २५ गावांमधील नागरिक व विद्यार्थी रेवराल-राजाेली-काेदामेंढी मार्गाचा वापर माैदा शहरासह अन्य गावांमध्ये ये-जा करण्यासाठी करतात. त्यांना रहदारीसाठी या मार्गाला पर्यायी राेड नाही. प्रशासनाने या मार्गाच्या रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम हाती घेतले हाेते. मात्र, ते मध्येच बंद करण्यात आले. माैदा-काेदामेंढीपर्यंतच्या राेडच्या कामाला मंजुरी नसल्याने ते बंद करण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागातील जाणकार व्यक्तींनी दिली.

राजोली, रेवराल, चारभा, पिपरी, सुंदरगाव, मांगली (तेली) येथील नागरिक रोज एनटीपीसीमध्ये कामाला, तसेच मौदा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, सरकारी दवाखान्यात व इतर कामांसाठी याच रस्त्याने जातात. दरम्यान, भविष्यातील अपघात टाळण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण व दर्जेदार डांबरीकरण करण्याची मागणी रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, उपसरपंच महेंद्र बोरघरे, राजोलीच्या सरपंच मीना तांडेकर, उपसरपंच काशीनाथ पोटभरे यांच्यासह नागरिकांनी केली. या राेडवरील अपघाताची नैतिक जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वीकारावी, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख देवेंद्र गाेडबाेले यांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

...

राेडवरील खड्डे जिवावर उठले

या राेडवर सर्वत्र छाेटे-माेठे खड्डे तयार झाले आहेत. शिवाय, राेडच्या दाेन्ही बाजूंचे डांबरीकरण दबले गेले आहे. त्यामुळे हा राेड उंच सखल झाला आहे. रुंद व खाेल खड्डे, राेडवर विखुरलेली गिट्टी अपघातास कारणीभूत ठरत आहे. या राेडवर दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघात हाेण्याच्या घटना सामान्य झाल्या आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांमध्ये चारचाकी वाहने गेल्यास इंजिनचा भाग जमिनीला लागताे. त्यामुळे अपघातांसाेबत वाहनांचेही नुकसान हाेत असल्याने राेडवरील खड्डे वाहनचालकांच्या जिवावर उठले आहेत.