शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

कुठल्या भागात किती पाणी देणार सांगा? सर्वपक्षीय नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:24 IST

मनपा आयुक्तांनी जनतेसमोर ‘प्लान’ मांडावा; निधी कुठे खर्च होतोय, याचा लेखाजोखा द्यावा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

नागपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच नागपूर शहरात पाणीटंचाई भासू लागली आहे. बहुतांश भागांत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रशासक असलेले आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पाणीटंचाई निवारणाचा प्लान जनतेसमोर सादर करावा. कुठल्या भागात किती वेळ पाणी दिले जाईल, जलवाहिन्या नसलेल्या भागात टँकरची व्यवस्था काय असेल, हे आयुक्तांनी स्पष्ट करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे म्हणाले, आयुक्तांनी पाणीटंचाई निवारणाचा आराखडा जनतेसमोर मांडावा. उन्हाळ्यात पाण्याची वाढती मागणी विचारात घेता काय नियोजन आहे, किती पाण्याची उचल होते व वितरण किती होते, किती वेळ पाणी दिले जाईल, एखाद्या भागात ब्रेकडाऊन झाले तर हेल्पलाईन नंबर काय असेल, नॉन नेटवर्क भागासाठी विशेष उपाययोजना काय असतील, कोणत्या झोन अंतर्गत किती टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, या सर्व गोष्टींचा उहापोह आयुक्तांनी करण्याची गरज गुडधे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व माजी गटनेते दुनेश्वर पेठे म्हणाले, शहरात दहा वर्षांपूर्वी २४ बाय ७ योजना सुरू झाली. तरीही एक-दोन झोन सोडले तर इतर भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. आता अमृत योजनेत जलकुंभ बांधण्यात आले आहेत. मात्र ते भरण्याची व्यवस्था नाही. अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे लोक माजी नगरसेवकांवर रोष व्यक्त करीत आहेत. तक्रारी केल्या तर झोनचे अधिकारी हात वर करतात. त्यामुळे आता प्रशासक असलेल्या आयुक्तांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी व पाणीप्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी पेठे यांनी केली.

शिवसेनेचे नेते (उद्धव ठाकरे गट) माजी उपमहापौर शेखर सावरबांधे म्हणाले, शहरात २४ बाय ७ योजनेचे बारा वाजले आहेत. काही भागांत तर नाममात्र पाणी मिळते. महापालिका आयुक्तांनी आमदार, माजी गटनेते, सर्व पक्षाचे प्रमुख, पाणी विषयातील तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलवावी. त्यांच्या सूचना ऐकून घ्याव्या व त्याचा अंतर्भाव करून पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सावरबांधे यांनी व्यक्त केली.

जबाबदारी निश्चित करा

बसपाचे माजी गटनेते जितेंद्र घोडेस्वार म्हणाले, दीड वर्षांपासून प्रशासनाचा जनतेशी प्रत्यक्ष संपर्क नाही. माजी नगरसेवकांनी मांडलेल्या समस्यांची झोन स्तरावर दखल घेतली जात नाही. अधिकारी टाळाटाळ करतात. निवेदन स्वीकारण्याची औपचारिकता पार पाडतात. त्यामुळे आयुक्तांनी सर्वपक्षीय माजी नगरसेवकांची एक बैठक बोललावी. त्यांच्या भागातील पाणी समस्येची माहिती घ्यावी व ती समस्या सोडविण्यासाठी उपाय योजावे. याशिवाय पाणी समस्येबाबत झोन स्तरावर एका अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही घोडेस्वार यांनी केली.

मनसेचे शहरप्रमुख विशाल बडगे यांनीही पाणीटंचाईविरोधात राजकीय पक्षांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असा इशारा दिला. प्रशासन समस्या ऐकत नाही म्हणून लोक राजकीय पक्षांकडे येतात. लोकांच्या समस्या राजकीय पक्ष प्रशासनाकडे मांडतात. प्रशासनाला वेठीस धरणे हा कुणाचाही हेतू नसतो. पण प्रशासनानेही जनतेला वेठीस धरू नये, असी अपेक्षाही बडगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात