शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

कुठल्या भागात किती पाणी देणार सांगा? सर्वपक्षीय नेते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 12:24 IST

मनपा आयुक्तांनी जनतेसमोर ‘प्लान’ मांडावा; निधी कुठे खर्च होतोय, याचा लेखाजोखा द्यावा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

नागपूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच नागपूर शहरात पाणीटंचाई भासू लागली आहे. बहुतांश भागांत अपुरा पाणीपुरवठा होत आहे. महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्यामुळे प्रशासक असलेले आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पाणीटंचाई निवारणाचा प्लान जनतेसमोर सादर करावा. कुठल्या भागात किती वेळ पाणी दिले जाईल, जलवाहिन्या नसलेल्या भागात टँकरची व्यवस्था काय असेल, हे आयुक्तांनी स्पष्ट करावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे म्हणाले, आयुक्तांनी पाणीटंचाई निवारणाचा आराखडा जनतेसमोर मांडावा. उन्हाळ्यात पाण्याची वाढती मागणी विचारात घेता काय नियोजन आहे, किती पाण्याची उचल होते व वितरण किती होते, किती वेळ पाणी दिले जाईल, एखाद्या भागात ब्रेकडाऊन झाले तर हेल्पलाईन नंबर काय असेल, नॉन नेटवर्क भागासाठी विशेष उपाययोजना काय असतील, कोणत्या झोन अंतर्गत किती टँकरने पाणीपुरवठा केला जाईल, या सर्व गोष्टींचा उहापोह आयुक्तांनी करण्याची गरज गुडधे यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष व माजी गटनेते दुनेश्वर पेठे म्हणाले, शहरात दहा वर्षांपूर्वी २४ बाय ७ योजना सुरू झाली. तरीही एक-दोन झोन सोडले तर इतर भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. आता अमृत योजनेत जलकुंभ बांधण्यात आले आहेत. मात्र ते भरण्याची व्यवस्था नाही. अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे लोक माजी नगरसेवकांवर रोष व्यक्त करीत आहेत. तक्रारी केल्या तर झोनचे अधिकारी हात वर करतात. त्यामुळे आता प्रशासक असलेल्या आयुक्तांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवावी व पाणीप्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी पेठे यांनी केली.

शिवसेनेचे नेते (उद्धव ठाकरे गट) माजी उपमहापौर शेखर सावरबांधे म्हणाले, शहरात २४ बाय ७ योजनेचे बारा वाजले आहेत. काही भागांत तर नाममात्र पाणी मिळते. महापालिका आयुक्तांनी आमदार, माजी गटनेते, सर्व पक्षाचे प्रमुख, पाणी विषयातील तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक बोलवावी. त्यांच्या सूचना ऐकून घ्याव्या व त्याचा अंतर्भाव करून पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा सावरबांधे यांनी व्यक्त केली.

जबाबदारी निश्चित करा

बसपाचे माजी गटनेते जितेंद्र घोडेस्वार म्हणाले, दीड वर्षांपासून प्रशासनाचा जनतेशी प्रत्यक्ष संपर्क नाही. माजी नगरसेवकांनी मांडलेल्या समस्यांची झोन स्तरावर दखल घेतली जात नाही. अधिकारी टाळाटाळ करतात. निवेदन स्वीकारण्याची औपचारिकता पार पाडतात. त्यामुळे आयुक्तांनी सर्वपक्षीय माजी नगरसेवकांची एक बैठक बोललावी. त्यांच्या भागातील पाणी समस्येची माहिती घ्यावी व ती समस्या सोडविण्यासाठी उपाय योजावे. याशिवाय पाणी समस्येबाबत झोन स्तरावर एका अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही घोडेस्वार यांनी केली.

मनसेचे शहरप्रमुख विशाल बडगे यांनीही पाणीटंचाईविरोधात राजकीय पक्षांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असा इशारा दिला. प्रशासन समस्या ऐकत नाही म्हणून लोक राजकीय पक्षांकडे येतात. लोकांच्या समस्या राजकीय पक्ष प्रशासनाकडे मांडतात. प्रशासनाला वेठीस धरणे हा कुणाचाही हेतू नसतो. पण प्रशासनानेही जनतेला वेठीस धरू नये, असी अपेक्षाही बडगे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :WaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात