शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीवर आक्षेपाचा पूर

By admin | Updated: June 21, 2016 02:43 IST

जलप्रदाय विभागाच्या त्रुटींमुळे उपभोक्त्यांना अव्वाच्या सव्वा पाणी बिल पाठविण्यात येते. यामुळे पाणीपट्टी थकबाकीला हा

नागपूर : जलप्रदाय विभागाच्या त्रुटींमुळे उपभोक्त्यांना अव्वाच्या सव्वा पाणी बिल पाठविण्यात येते. यामुळे पाणीपट्टी थकबाकीला हा विभागच जबाबदार असल्याने ५० टक्केच सूट का? ७५ टक्के वा त्याहून अधिक का नाही, असा सवाल उपस्थित करून विरोधकांनी गोंधळ घातला. तर सत्ताधाऱ्यांनी निर्णयाचे जोरदार समर्थन केल्याने सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सूट देण्याच्या टक्केवारीवरून सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांत चांगलीच चकमक उडाली. पाणीपट्टी थकबाकीदारांना ५० टक्के सवलत देण्याची योजना जलप्रदाय विभागाने आणली आहे. यावर आक्षेप घेत काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांनी एकमुस्त तडजोडीचा मुद्दा नोटीसद्वारे सभागृहात उपस्थित केला होता. जलप्रदाय विभागाच्या पाणीपट्टीसंदर्भातील धोरण निश्चित व्हावे, अशी मागणी करून दरवर्षी होणाऱ्या ५ टक्के पाणीपट्टीच्या दरवाढीला दर्शविला. थकबाकीदारांप्रमाणे नियमित बिल भरणाऱ्यांनाही सवलत देण्याची मागणी त्यांनी केली. महापालिकेच्या निवडणुका नजीक आल्याने सत्ताधाऱ्यांनी पाणीपट्टीवर ५० टक्के सूट देण्याची योजना आणली आहे. वास्तविक थकबाकीला जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच जबाबदार आहे. उपभोक्त्यांना अव्वाच्या सव्वा बिल पाठवीत आहे. २५ हजारांचे बिल असेल तर एक लाख पाठविले जाते. वसुलीसाठी सक्ती केली जाते. तक्रार करणाऱ्या नगरसेवकांच्या विरोधात ओसीडब्ल्यूकडून पोलिसात गुन्हे दाखल केले जातात. काँग्रेस, बसपाचा सभात्यागथकबाकीदारांना ५० टक्के सूट देण्याला आमचा विरोध नाही. परंतु जलप्रदाय विभागाच्या सदोष पद्धतीमुळे अवास्तव बिल आल्याने थकबाक ीदार वाढले आहेत. त्यामुळे थकबाकीदारांना ७५ टक्के सूट द्या, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली. काँग्रेस सदस्यांनीही ही मागणी लावून धरली. यासाठी घोषणाबाजी करीत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर बसपाचे गटनेते गौतम पाटील व किशोर गजभिये यांनी १०० टक्के सूट देण्याची मागणी केली. ही मागणी नाकारल्याने बसपाच्या सदस्यांनी सभात्याग केला.