शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पाण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद सभागृहात हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:03 IST

:जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. पावसाळा तोंडावर असताना मंजूर बोअरवेलच्या तुलनेत निम्म्याही बोअरवेल झाल्या नाहीत. विशेष म्हणजे हे काम ७ जूनच्या आत करायचे आहे. आज १८ मे झाला आहे. प्रशासन अद्यापही खुलासे आणि मंजुऱ्या मिळविण्यातच व्यस्त आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या ग्रामीण भागाला टंचाई मुक्त कधी करणार, असा सवाल जि.प.सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांना आपल्या खुर्चीवर बसण्याचा काहीच अधिकार नाही, असा हल्ला सत्ताधारी व विरोधकांनी जिल्हा परिषद सीईओं डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकाऱ्यांवर चढविला.

ठळक मुद्देसत्ताधारी-विरोधकांचा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल : टंचाई निवारण्यात प्रशासन अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. पावसाळा तोंडावर असताना मंजूर बोअरवेलच्या तुलनेत निम्म्याही बोअरवेल झाल्या नाहीत. विशेष म्हणजे हे काम ७ जूनच्या आत करायचे आहे. आज १८ मे झाला आहे. प्रशासन अद्यापही खुलासे आणि मंजुऱ्या मिळविण्यातच व्यस्त आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या ग्रामीण भागाला टंचाई मुक्त कधी करणार, असा सवाल जि.प.सदस्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांना आपल्या खुर्चीवर बसण्याचा काहीच अधिकार नाही, असा हल्ला सत्ताधारी व विरोधकांनी जिल्हा परिषद सीईओं डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकाऱ्यांवर चढविला.जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जि.प.ची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विरोधक व सत्ताधाऱ्यांनी ग्रामीण जनतेच्या पाणी समस्येवर एकत्र येत प्रशासनावर हल्लाबोल चढविला. जि.प.च्या सभागृहात पाण्याचा विषय चांगलाच पेटला . यावेळी विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यापूर्वी जि.प.मध्ये पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पाणी टंचाईच्या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी १६०० बोअरवेल जि.प.च्या माध्यमातून करू असे सांगितले होते. मात्र, जि.प.प्रशासन याबाबत इतके सक्षम नाही याची आम्हाला जाणीव असल्यामुळे आम्ही याला विरोध दर्शविला होता. आज तो विरोध खरा ठरला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासनाच्या चुकीमुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदस्यांना आपल्या सर्कलमध्ये नागरिकांना तोंड दाखविता येतनाही. जिल्हा परिषदेची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. याला जबाबदार कोण, याचे अध्यक्षांनी उत्तर द्यावे अशी मागणी करुन ते म्हणाले की, टंचाई निवारणार्थ जि.प. प्रशासन सक्षम नाही का? निधी नाही का, याचा खुलासा करण्याची मागणी केली.यावेळी सदस्य चंद्रशेखर चिखले म्हणाले की, टंचाईचा सामना करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला एका सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे. विजय टाकळीकर हे जोवर जि.प.मध्ये आहेत, तोवर जिल्ह्यातील टंचाई मिटू शकत नाही, असा आरोप केला. उज्ज्वला बोढारे यांनी विभागाकडे बोअरवेल दुरूस्तीसाठी साहित्य नसल्याची ओरड करीत हिंगण्यातील डेग्मा खुर्दच्या पाणी टंचाईचे वास्तव मांडत अधिकारी दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. दरम्यान अध्यक्ष निशा सावरकर यांनी प्रशासनाकडे बोट दाखवत आम्ही टंचाईच्या कामाची मंजुरी आणतो, पैसे आणतो आणि प्रशासन करते तरी काय, असा प्रश्न सीईओंना केला. टंचाईच्या कामाच्या फायली घेऊन अधिकाऱ्यांच्या मागे फिरावे का, असा सवाल सभापती उकेश चव्हाण यांनी केला. सभागृहात बहुतांश सदस्यांनी आपापल्या सर्कलच्या पाणी टंचाईची परिस्थितीची जाणीव प्रशासनाला करून देत नाराजी व्यक्त केली.मनोज तितरमारे म्हणाले की, जि.प.कडे १०१५ पाईप शिल्लक असतानाही त्याचा वापर का होत नाही? कुणाची परवानगी लागत होती. चिखले म्हणाले की, बोअरवेल पाईपचा पुरवठा करणाऱ्या नरखेड येथील एका ट्रेडर्सचे कोट्यवधी रुपये जि.प.कडे थकीत असल्यामुळे तो पाईपचा पुरवठा करण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत पाणी पुरवठ्याची कामे कशी मार्गी लागणार असा सवाल उपस्थित केला.विभागप्रमुखांना दिशाभूल केल्याचा फटकाबोअरवेलसाठी ३५४० पाईपची आवश्यकता असताना केवळ २५२५ पाईपचीच आॅर्डर जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून २ मे २०१८ रोजी देण्यात आल्याची माहिती सभागृहात टाकळीकर यांनी दिली. मात्र, आवश्यकतेपेक्षा १०१५ पाईप कमी बोलविले तर डीपीसीच्या कामाचे जि.प.कडे उर्वरित असलेले १०१५ पाईप हे गृहीत धरूनच अशी आॅर्डर दिली का? असा सवाल मनोज तितरमारे यांनी उपस्थित केला. यावर सीईओंनी सभागृहाला समाधान होईल असे उत्तर देऊन वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी टाकळीकरांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. तर अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवाअधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जर विरोधी सदस्यांकडून पदाधिकाऱ्यांवर आरोप - प्रत्यारोप होत असतील, तर अशा अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अशी मागणी उपाध्यक्ष डोणेकर यांनी सभागृहात केली. पदाधिकाऱ्यांनी आपली व्यथा सांगू नयेअधिकारी आमचे ऐकत नाही, त्यांच्यापाठीमागे फाईल घेऊन फिरावे का? असा सवाल उकेश चव्हाण यांनी सभागृहात केला. सत्ता तुमची, मुख्यमंत्री तुमचे, पालकमंत्री तुमचे, असे असतानाही पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांपुढे हतबल व्हावे लागते, ही सत्ताधाऱ्यांची शोकांतिका आहे. आम्हाला आपल्या व्यथा सांगू नका, जनतेची कामे करा, असा मनोहर कुंभारे यांनी उकेश चव्हाण यांना सल्ला दिला.

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरwater scarcityपाणी टंचाई