शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

व्हॉल्व्ह फुटला; रस्ता झाला तलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:43 IST

हंसापुरी भागातील बोरीयापुरा (खाण) येथे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले.

ठळक मुद्देबोरीयापुरा जलकुंभावरील घटना : तीन कर्मचारी जखमी; आजूबाजूच्या घरात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हंसापुरी भागातील बोरीयापुरा (खाण) येथे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. आजूबाजूच्या १५ ते २० घरात पाणी शिरले. यामुळे सामानाचे नुकसान झाले. तसेच व्हॉल्व्ह खोलणाºया कर्मचाºयासह तीन जण यात किरकोळ जखमी झाले.पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी जलकुंभाला जोडणाºया पाईप लाईनचा व्हॉल्व्ह खोलत असताना बाजूला उभा असलेला सुरक्षा गार्ड व त्याचा एक सहकारी पाण्याच्या जोराच्या प्रवाहामुळे फेकल्या गेल्याने किरकोळ जखमी झाले.व्हॉल्व्ह खोलणारा कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी ९ च्या सुमारास जलकुंभावर पोहचला. व्हॉल्व्ह खोलत असताना लगतचा पाईपचा भाग अचानक फुटला. कर्मचारी व सुरक्षा गार्ड पाण्याच्या प्रवाहामुळे बाजूला फेकले गेले. पाण्याला प्रचंड वेग असल्याने १५ ते २० फूट उंचीपर्यत पाणी उडत होते. आजूबाजूच्या नागरिकांनी घराच्या छतावरून वाहणाºया पाण्याचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. घटनेची माहिती मिळताच प्रभाग १९ चे नगरसेवक अ‍ॅड.संजय बालपांडे घटनास्थळी पोहचले. त्यांनी जलप्रदाय विभाग व ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांना याची माहिती दिली. थोड्या वेळात अधिकारी घटनास्थळी आले. पाण्याचा दाब कमी झाल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आऊ टलेट १० वर्षापूर्वीचे जुने आहे. ते दुरुस्त न केल्याने ही घटना घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावीपाण्याची लाईन लिकेज असल्याची तक्रार के ली होती. परंतु ओसीडब्ल्यूच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली. घरात पाणी शिरल्याने फ्रीज, सोफ ा, स्वयंपाक घरातील सामानाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, अशी मागणी नगरसेवक अ‍ॅड. संजय बालपांडे यांनी केली आहे.खड्ड्यात नगरसेवक पडलेबोरीयापुरा जलकुंभाला पेंच -४ प्रकल्पाची पाईप लाईन जोडण्याचे काम करताना जलकुंभाजवळील मैदानात खोदकाम करण्यात आले. परंतु खड्डे व्यवस्थित बुजविलेले नाही. एका खड्ड्यावर अर्धवट स्लॅब टाकण्यात आली आहे. या खड्ड्यात पडल्याने संजय बालपांडे किरकोळ जखमी झाले.पाणीपुरवठा बाधितया जलकुं भावरुन पाणीपुरवठा होणाºया हंसापुरी, बोरीयापुया, ज्योतीनगर, गांजाखेत, गोळीबार चौक, टिमकी तीन खंबा आदी भागांना पाणीपुरवठा होतो. परंतु पाईप लाईन फुटल्याने काही भागांचा पाणीपुरवठा बाधित झाला.