शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा पुन्हा संकटात

By admin | Updated: February 16, 2016 04:06 IST

कर्जबाजारीपणामुळे कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरकर्जबाजारीपणामुळे कंबरडे मोडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वन्यप्राण्यांमुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे गतवर्षीच्या तुलनेत शेतपीक नुकसान दुपटीने झाले आहे. गतवर्षी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांना ६६ लाख ८८ हजार रुपयांचा फटका बसला होता. यंदा १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत हा आकडा १ कोटी २४ लाख ६५ हजार रुपयापर्यंत पोहचला आहे. वनविभागाच्या वतीने गत आठवड्यात एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यात ही माहिती पुढे आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वनविभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती यात देण्यात आली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) वन्यप्राण्यांमुळे शेतपीक नुकसानीच्या १५८५ घटना घडल्या. यात १ कोटी १ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गत वर्षींच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. २०१४-१५ वर्षांत नुकसानीच्या १०३० घटना घडल्या होत्या. यात ४६ लाख ९ हजार रुपयाच्या शेतपिकांचे नुकसान झाले होते. वन्यजीव आणि वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. मात्र नुकसानीची आकडेवारी पाहता, या उपाययोजना किती व्यापक आहेत, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतपिकांसोबत पशुधन हानीच्या घटनातही वाढ झाली आहे. २०१५-१६ या वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) पशुधन हानीची २२४ प्रकरणे वनविभागाकडे नोंदविण्यात आली. वन्यप्राण्यांचा धोका कायमचरात्री जागली करणाऱ्या आणि शिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका आजही कायमच आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २०१५-१६ वर्षांत (१० फेब्रुवारी २०१६ पर्यंत) २० शेतकरी जखमी झाले. याच्या नुकसानभरपाईपोटी ४ लाख ३६ हजार अदा करण्यात आले. गत वर्षी जखमींची संख्या पाच इतकी होती. वन्यप्राण्यामुळे मनुष्य मृत्यूचे एक प्रकरण १० फेब्रुवारी २०१६ पर्यंत पुढे आले आहे. यात संबंधिताच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.