शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

नागपूर जिल्ह्यात युरियाचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 1:35 AM

खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.

ठळक मुद्दे कृषी सभापती म्हणतात, बाहेरच्या जिल्ह्यातील शेतकरी घेऊन जातात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासतो आहे. रब्बीची चाहूल लागल्यानंतरही हा तुटवडा संपण्याची चिन्हे नाहीत. आजही शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रात फेऱ्या मारत आहेत. जिल्ह्यातील खताच्या तुटवड्यासंदर्भात कृषी सभापतींनी सांगितले की, गेल्यावर्षीपेक्षा खतांचा अधिकचा साठा उपलब्ध झाला असला तरी, इतर जिल्ह्यातील शेतकरी नागपुरातून खतांची खरेदी करीत असल्याने जिल्ह्यात तुटवडा भासतो आहे.नुकताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात रासायनिक खतांचा तुटवडा असल्याचे सांगत कृषी अधीक्षकांना निवेदन दिले होते व खतांची काळाबाजारी होत असल्याचा आरोपही केला होता. शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटानी दरवर्षी ग्रस्त असतो. यंदा दोन्ही संकटे मानगुटीवर असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने संपूर्ण शेती पाण्यात गेली असता कपाशीसाठी गरजेचे असलेली खतेही उपलब्ध होत नसल्याची ओरड आहे. कृषी सेवा केंद्रात गेल्यानंतर विक्रेते खतच उपलब्ध नसल्याचे सांगत आहे. परंतु, प्रशासकीय स्तरावर ही बाब मान्य नसल्याचे दिसून येते. गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. बैठकीनंतर कृषी सभापती वैद्य यांनी खताच्या तुटवड्यासाठी लगतच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर खापर फोडले. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० हजार मेट्रिक टन अधिकचे खत प्राप्त झाल्याचे सांगितले. मध्य प्रदेश, वर्धा तालुक्यातील सेलू, अमरावतीचा काही भाग येथील शेतकरी नागपूर जिल्ह्यातून खते खरेदी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात खतांची उपलब्धतायुरियाबद्दल बोलताना त्यांनी सांगतले की, गेल्यावर्षी ४५ हजार मेट्रिक टन युरिया मंजूर होता. यंदा ५१ हजार १६० मेट्रिक टन युरियाची मागणी केली होती. त्यानंतरही आतापर्यंत ५६ हजार १८९ मेट्रिक टन युरिया प्राप्त झाला. त्यात ४५ हजार ४२१ मेट्रिक टन युरियाची विक्री झाली असून अद्याप १० हजार ७६८ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी २१ हजार २९० मेट्रिक टन मंजूर होते. त्यात २४ हजार ३६८ मेट्रिक टन उपलब्ध झाले. तर २२ हजार ६३२ मेट्रिक टन विक्री झाली असून १,७३६ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर