शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा होणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 20:43 IST

राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समावेश : युवकांनाही मिळणार रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील शहरी भागाचा झपाट्याने विकास होत आहे. परंतु गेल्या काही वर्षात राज्यात पडलेला दुष्काळ, कृषी उत्पादनामध्ये अनियमितता आल्यामुळे ग्रामीण जनतेचे राहणीमान तणावाखाली आहे. मागास भागातील खेड्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्यासाठी शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील ४१ गावांचा समावेश असून, या अभियानात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच गावाचा विकास व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.शासनाने दोन वर्षासाठी हे अभियान हाती घेतले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यातील दुर्गम भागातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकासावर आधारीत उपक्रम राबवून बेरोजगारांना रोजगार देण्याचा तसेच आवश्यक असलेल्यांना घरकूल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जि.प.च्या ग्रामीण विकास यंत्रणेला दिली आहे. शासनाची यंत्रणा व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी रामटेक भागात मेळावा घेऊन, मोठ्या संख्येने युवकांना यात सहभागी करून घेतले. या संपूर्ण अभियानावर जिल्हाधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे. प्रत्येक पंधरवड्यात अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. योजनेची आर्थिक उद्दिष्टे

  • शेतक ऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट करणे
  • पिकांच्या प्रति हेक्टरी उत्पादनात सुधार करणे
  • कुटुंबांना दारिद्र्यरेषेवर आणणे
  • ग्रामीण युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देणे

सामाजिक उद्दिष्ट

  • कुटुंबांना पक्की घरे बांधून देणे
  • शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करणे
  • सिंचनासाठी पाणीपुरवठा करणे

 मानवी विकास उद्दिष्ट

  • बालमृत्यू दरात लक्षणीय घट करणे
  • आरोग्य व स्वच्छतेचा दर्जा सुधारणे
  • शिक्षणाच्या क्षेत्रात सुधारणा करणे

 गावांची निवडरामटेक : बांद्रा, गर्रा, खुर्सापार, डोंगरगाव, खडगीखेडा, कामठी, सावरा, उसरीपार, सावरा, जमुनिया, टुयापार, फुलझरी, खापा, पिपरिया, सालई, सिल्लारी, तोतलाडोहपारशिवनी : बोरी, रमजान, सालई, अंबाझरी, मकरधोकडा, सालेघाट, सिलादेवी, सुवरधरा, गारगोटी, पारडी, घाटपेंढरी, किरंगीसर्रा, कोलितमारा, मेहकेपार

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासnagpurनागपूर