शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

टोमॅटो, हिरवी मिरची @ १५०! पावसामुळे भाजीपाला कडाडला

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 12, 2023 19:28 IST

गृहिणी संतप्त; स्वयंपाकघराचे बजेट वाढले

नागपूर : पावसामुळे टोमॅटोसह सर्वच भाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो आणि हिरवी मिरची १५० रुपये किलो आहे. याशिवाय दोडके, ढेमस, शेंगा, फूल कोबी, कारले आणि अन्य भाज्या ६० ते ८० रुपये किलो विकल्या जात आहेत. वाढत्या भावामुळे गृहिणी संतप्त असून त्यांचे स्वयंपाकघराचे महिन्याचे बजेट वाढले आहे.

कळमना युवा सब्जी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद भैसे म्हणाले, एक महिन्याआधी आलेल्या पावसामुळे अद्रक आणि लसणाचे भाव वाढले आहेत. एक महिन्याआधी किरकोळमध्ये कोथिंबीर १०० रुपये, टोमॅटोचे भाव ६० रुपये होते. पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. आवक फारच कमी असल्याने भाव तेजीत आहेत. या दरवाढीमुळे गृहिणींनी काही भाज्यांकडे पाठ फिरविली असून कडधान्याचा उपयोग करीत आहेत. उपबाजार कॉटन मार्केटमध्ये नागपूर जिल्ह्याच्या काही भागातून आवक सुरू आहे.

टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची विक्रीत घसरण

महाल, झेंडा चौक आणि सोमवारी क्वार्टर बाजारातील विक्रेते म्हणाले, शेंगा, वांगे, फूल कोबी, पत्ता कोबी, पालक, चवळी भाजीचे भाव आवाक्यात आहेत. अन्य भाज्यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे लोकांनी खरेदीकडे पाठ फिरविली आहे. याशिवाय गुंतवणूक वाढल्यामुळे या व्यवसायात जोखीम वाढली आहे. भाज्यांची विक्रीची चिंता असते. अनेकदा तोटा सहन करावा लागतो. टोमॅटो, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची विक्री कमी झाली आहे.

टोमॅटोची कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून आवक

नागपुरात छत्तीसगड, मदनपल्ली (आंध्रप्रदेश) आणि बेंगळुरू येथून टोमॅटोची आवक होते. संगमनेर, नाशिक, छिंदवाडा, बुलढाणा, औरंगाबाद येथून होणारी आवक सध्या बंद आहे. याशिवाय स्थानिक शेतकºयांकडे टोमॅटो उपलब्ध नाहीत. हिरवी मिरची बुलढाणा येथून येत आहे. पावसामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. अनेक घटकांचा परिणाम दरवाढीवर झाली आहे. कोथिंबीरची सर्वाधिक आवक मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातून होते. या भागातही पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे भाव वधारले आहेत.

स्वयंपाकघरात डाळींचा जास्त उपयोग

भाज्यांच्या वाढत्या किमतीवर गृहिणींनी उपाय शोधला आहे. भाजीपाल्याकडे कानाडोळा करीत स्वयंपाकघरात प्रथिनांचा खजिना असलेल्या डाळींचा उपयोग सुरू केला आहे. याशिवाय बेसनचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. गृहिणींचा कमी किमतीच्या पालेभाज्यांवर भर आहे.

भाज्यांचे कळमन्यात प्रति किलो भावप्रकार घाऊक भाव किरकोळ भावटोमॅटो ७०-१०० १५०-१६०हिरवी मिरची ८०-१०० १५०-१६०कोथिंबीर ८० १३०सिमला मिरची ४०-५० ८०-९०फूल कोबी २५-३० ५०-६०पत्ता कोबी १५-२० ३०-४०चवळी शेंग ३०-४० ६०-७०गवार ५० ८०तोंडले ३०-४० ७०ढेमस ३०-४० ७०दोडके ३५ ७०फणस २० ४०कोहळे २० ४०लवकी १५ ३०पालक १५ ३०मेथी ४० ७०

टॅग्स :vegetableभाज्याInflationमहागाई