शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसाठी ते करतात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST

नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा ...

नागपूर : उन्हाळा आला की जंगलातील पाणवठे सुकायला लागतात. वनविभागाद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते; पण ती अपुरी पडते. अशा वेळी पाण्याच्या शाेधात प्राण्यांची जंगलाबाहेर येऊन गावांमध्ये भटकंती सुरू असते. शिवाय एका जंगलातून दुसरीकडे भटकंती करताना वाटेत पाण्यासाठी त्यांची धडपड हाेते. प्राण्यांची ही धडपड लक्षात घेत ग्रामायणच्या निसर्गविज्ञान टीमतर्फे वन्यजिवांच्या भ्रमणमार्गातील पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली जात आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्राण्यांची तृष्णा शमविण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.

ही व्यवस्था सांभाळणारे विजय घुगे यांनी या कार्याबद्दल माहिती दिली. निसर्ग विज्ञानच्या टीमने २०१५ पासून हे कार्य सुरू केले आहे. विशेषत: नुकतेच मुख्यमंत्र्यांनी संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा दिलेल्या मुनिया रिजर्व्ह फाॅरेस्टमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात ही व्यवस्था करण्यात येते. मुनिया हे वनक्षेत्र ९९५२ हेक्टर म्हणजे जवळपास १०० चाैरस किलाेमीटरमध्ये पसरले असून ताडाेबा, बाेर, उमरेड कर्हांडला व पेंच अभयारण्यादरम्यान भटकंती करणाऱ्या वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे. उन्हाळ्यात भटकंती करणारे प्राणी गावाकडे पाण्याच्या शाेधात येत असतात. मानव-वन्यजीव संघर्षाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेत मुनियाच्या वनक्षेत्रात वनविभाग व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली. असलेल्या पाणवठ्यांची दुरुस्ती करण्यात आली. नंतर येथे टँकर लावून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यात काॅरिडाेरमधील गावांच्या नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरत असल्याचे घुगे यांनी सांगितले.

यावर्षीही पाणीपुरवठ्याचे कार्य सुरू करण्यात येत असल्याचे घुगे यांनी स्पष्ट केले. सध्या काही पाणवठ्यात पाणी आहे तर अनेक सुकलेले आहेत. १५ एप्रिलनंतर येथील परिस्थिती भीषण हाेणार आहे. त्यानुसार पाणवठे स्वच्छ करण्याचे व बाेअरवेल दुरुस्तीचे काम वनविभाग व गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पाणीपुरवठ्याचे काम सुरू हाेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एका जंगलातून दुसरीकडे भ्रमण करताना वन्यप्राण्यांसाठी मुनिया वनक्षेत्रातून जाणारा एकमेव मार्ग आहे. या पाणवठ्यांचे पाणी केवळ वन्य प्राण्यांचीच तहान भागवते असे नाही तर गावातील पाळीव प्राणीही आपली तृष्णा भागवतात. येथील बाेअरवेलचे पाणी वाटसरूंनाही लाभदायक ठरणारे आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यातून या कार्याला गती मिळाली आहे.

- विजय घुगे, ग्रामायण निसर्ग विज्ञान संस्था